Monsoon 2023: राज्यात पावसाचे पुनरागमन, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणात येलो अलर्ट

मुंबई: राज्यातील सर्व जनतेसाठी आनंदाची बातमी हवामान विभागाने (imd) दिली आहे. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात रुसून बसलेला पाऊस (monsoon) सप्टेंबरमध्ये परतत आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यात पुढील पाच दिवस पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्राच्या विविध भागांत पाऊस होणार आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार आहे.


हवामान विभागाने राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाचे पुणे केंद्राचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी याबाबत ट्वीट केले आहे.



राज्यात पुढील चार ते पाच दिवस पाऊस


भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील ४ ते ५ दिवस राज्यात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. बंगालच्या खाडीमध्ये चक्रवाती स्थिती बनल्याने कमी दबावाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पुढील ४८ तास महत्त्वाचे आहेत. या स्थितीमुळे राज्यात पाऊस बरसू शकतो. ३ ते ७ सप्टेंबरच्या कालावधीत कोकण, गोवा येथे मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ५ ते ७ सप्टेंबर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.


 


राज्यात कुठे होणार पाऊस


भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील दिवस विदर्भात पाऊस होऊ शकतो. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडामध्ये पावसाचे पुनरागमन होऊ शकते. मराठवाडामध्ये उस्मानाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.



ऑगस्ट महिना कोरडा


यंदाच्या वर्षी ऑगस्ट महिना पूर्णपणे कोरडा केला. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला होता. दरम्यान, सप्टेंबरमध्ये तरी चांगला पाऊस व्हावा अशी प्रार्थना शेतकरी करत आहेत.

Comments
Add Comment

TET Paper Leak : भिवंडीत दीड कोटींना विकला जात होता टीईटीचा पेपर! पोलिसांच्या 'SIT'कडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

मुंबई : राज्यातील लाखो तरुण-तरुणींच्या भविष्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य पेपरफुटी रॅकेटचा ठाणे

महापालिकेच्यावतीने पाणी आणि अन्नाची शुद्धता तपासणी

अहवाल आता व्हॉट्सअॅप, ईमेलवर प्राप्त होणार मुंबई : पाणी आणि अन्न हे आपल्या रोजच्या जगण्यातील अविभाज्य घटक आहेत.

Prajakta Lavangare : गृहनिर्माण संस्थांमध्ये कंपोस्ट खत निर्मितीला चालना द्या

अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांचे निर्देश मुंबई : स्रोतांच्या ठिकाणीच कचऱ्यावर प्रक्रिया

Ganesh Naik : महाराष्ट्राच्या वनहद्दीत पाच वर्षांत साडेतीन लाख झाडांवर कुऱ्हाड

सव्वा लाख झाडे सागवानाची; बेकायदेशीर वृक्षतोड रोखण्याचे मोठे आव्हान मुंबई : निसर्गसंपन्न महाराष्ट्राच्या

Deputy Chief Minister Eknath Shinde : टीईटी पेपरफुटीतील सूत्रधारांवर मकोका लावावा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, : टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून, या प्रकरणातील मुख्य

Mumbai Metro One : मुंबई मेट्रोत महिला सुरक्षा रक्षकाची सतर्कता; प्रवाशाकडून गांज्याची ९ पाकिटे जप्त, आरोपी अटकेत

मुंबई : मुंबई मेट्रो वनच्या (Mumbai Metro One) सुरक्षा व्यवस्थेने पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. एअरपोर्ट