Chandrayaan-3: चंद्रावर होणार आहे रात्र, १४-१५ दिवसांसाठी विक्रम आणि प्रज्ञान स्लीप मोडवर

नवी दिल्ली : Chandrayaan-3बाबत मोठे अपडेट समोर आले आहे. इस्त्रोने विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला १४-१५ दिवसांसाठी झोपवले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत इस्त्रोने सांगितले की रोव्हरने आपले काम पूर्ण केले आहे. त्याला सुरक्षित ठिकाणी पार्क करून स्लीप मोडमध्ये सेट केले आहे. APXS आणि LIBS पेलोड सध्या बंद आहे. या पेलोडच्या मदतीने डेटा लँडरच्या माध्यमातून पृथ्वीवर पाठवला जातो.


आपल्या पोस्टमध्ये इस्त्रोने पुढे लिहिले की सध्या बॅटरी पूर्णपणे चार्ज आहे. रिसीव्हर चालू ठेवण्यात आला आहे. आशा आहे की रोव्हर आपल्या असाईंनमेंटचा दुसरा भाग पूर्ण करण्यासाठी पुन्हा झोपेतून उठेल. जर असे झाले नाही तर तो चंद्रावर भारताचा चंद्र राजदूत म्हणून उपस्थित असेल.


चंद्रावर ५-६ तारखेपर्यंत अंधार पसरेल. सूर्य मावळणार आहे. त्यानंतर लँडर आणि रोव्हर पुढील १४-१५ दिवस अंधारात असतील. म्हणजेच चंद्राची रात्र सुरू होणार आहे. चंद्रयान ३ २३ ऑगस्टला संध्याकाळी सहा वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचले होते. त्यावेळेस तेथे सूर्य उगवला होता.





इस्त्रोची प्लानिंग होती की चंद्राच्या ज्या भागावर लँडर रोव्हर उतरतील तेथे पुढील १४ ते १५ दिवस सूर्याचा प्रकाश पडत राहील. म्हणजेच तिथे दिवस आहे. पुढील चार दिवस आणखी राहील. त्यानंतर अंधार होऊ लागेल. सूर्याची किरणे लँडर-रोव्हरवर पडणार नाहीत. यासाठी बॅटरी पूर्णपणे चार्ज केल्यानंतरच सिस्टीम बंद करण्यात आली आहे. म्हणजेच गरज पडल्यावर त्यांना पुन्हा सुरू करता येईल.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात