Chandrayaan-3: चंद्रावर होणार आहे रात्र, १४-१५ दिवसांसाठी विक्रम आणि प्रज्ञान स्लीप मोडवर

नवी दिल्ली : Chandrayaan-3बाबत मोठे अपडेट समोर आले आहे. इस्त्रोने विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला १४-१५ दिवसांसाठी झोपवले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत इस्त्रोने सांगितले की रोव्हरने आपले काम पूर्ण केले आहे. त्याला सुरक्षित ठिकाणी पार्क करून स्लीप मोडमध्ये सेट केले आहे. APXS आणि LIBS पेलोड सध्या बंद आहे. या पेलोडच्या मदतीने डेटा लँडरच्या माध्यमातून पृथ्वीवर पाठवला जातो.


आपल्या पोस्टमध्ये इस्त्रोने पुढे लिहिले की सध्या बॅटरी पूर्णपणे चार्ज आहे. रिसीव्हर चालू ठेवण्यात आला आहे. आशा आहे की रोव्हर आपल्या असाईंनमेंटचा दुसरा भाग पूर्ण करण्यासाठी पुन्हा झोपेतून उठेल. जर असे झाले नाही तर तो चंद्रावर भारताचा चंद्र राजदूत म्हणून उपस्थित असेल.


चंद्रावर ५-६ तारखेपर्यंत अंधार पसरेल. सूर्य मावळणार आहे. त्यानंतर लँडर आणि रोव्हर पुढील १४-१५ दिवस अंधारात असतील. म्हणजेच चंद्राची रात्र सुरू होणार आहे. चंद्रयान ३ २३ ऑगस्टला संध्याकाळी सहा वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचले होते. त्यावेळेस तेथे सूर्य उगवला होता.





इस्त्रोची प्लानिंग होती की चंद्राच्या ज्या भागावर लँडर रोव्हर उतरतील तेथे पुढील १४ ते १५ दिवस सूर्याचा प्रकाश पडत राहील. म्हणजेच तिथे दिवस आहे. पुढील चार दिवस आणखी राहील. त्यानंतर अंधार होऊ लागेल. सूर्याची किरणे लँडर-रोव्हरवर पडणार नाहीत. यासाठी बॅटरी पूर्णपणे चार्ज केल्यानंतरच सिस्टीम बंद करण्यात आली आहे. म्हणजेच गरज पडल्यावर त्यांना पुन्हा सुरू करता येईल.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने