Aditya L-1 Mission : मानवजातीच्या कल्याणासाठी आमचे अथक वैज्ञानिक प्रयत्न सुरूच राहतील

पंतप्रधान मोदी यांनी ट्विटद्वारे दिल्या शुभेच्छा


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही केले कौतुक


नवी दिल्ली : भारताने आपली महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहिम (Chandrayaan Mission) अत्यंत यशस्वीरित्या पार पाडली. हा भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरुन ठेवावा असाच क्षण आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीदेखील इस्रोच्या (ISRO) मुख्यालयात जाऊन शास्त्रज्ञांच्या चमूचे अभिनंदन केले. यानंतर काहीच दिवसांत भारताने आपली पहिलीवहिली सौरमोहिम हाती घेतली. आज या मोहिमेतील आदित्य एल-१ चे (Aditya L-1) यशस्वी उड्डाण झाले असून त्यानिमित्त भारतावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हे वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नांचं यश' असं ट्विट करत पुन्हा एकदा भारतीय शास्त्रज्ञांची पाठ थोपटली आहे.


पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, चांद्रयान-३ च्या यशानंतर भारताचा अवकाश प्रवास सुरूच आहे, भारताच्या आदित्य एल-१ या पहिल्या सौर मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी इस्रोच्या आमच्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन. संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी विश्वाची चांगली समज विकसित करण्यासाठी आमचे अथक वैज्ञानिक प्रयत्न सुरूच राहतील, असं मोदीजी म्हणाले आहेत.





अमित शाह यांनीही केले कौतुक


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आपल्या एक्स अकाऊंटद्वारे आदित्य एल-१ च्या प्रक्षेपणाचा व्हिडीओ शेअर करत भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, आपल्या शास्त्रज्ञांनी वेळोवेळी आपले सामर्थ्य आणि तेज सिद्ध केले आहे. भारताचे पहिले सौर मिशन आदित्य एल-१चे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल देशाला अभिमान आणि आनंद आहे. या अतुलनीय कामगिरीसाठी इस्रो संघाचे अभिनंदन. अमृत महोत्सवादरम्यान अंतराळ क्षेत्रातील आत्मनिर्भर भारताची पंतप्रधानांची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने ही एक मोठी वाटचाल आहे, असं अमित शाह म्हणाले.





Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

25 वर्षांच्या संसारात मिठाचा खडा , 7 लेकरांची आईने चारित्र्याच्या संशयाने जीव गमावला ; काय घडलं ?

Bihar Crime : बिहारमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. २५ वर्षाच्या संसारात मिठाचा खडा पडला. 25 वर्षांपूर्वी ज्या

Konkan Hapus' Fills Delhi : दिल्लीत 'कोकण हापूस'चा सुगंध! निवासी आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते आंबा महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन

नवी दिल्ली : दिल्लीच्या बाजारपेठेत अनेक प्रकारचे आंबे उपलब्ध असतात, मात्र तो आंबा अस्सल देवगड किंवा

Srilanka Cricket News : क्रिकेटविश्व हादरलं! 2 खेळाडूंनी हॉटेलच्या बाथरूममध्ये लपून काढले महिला डॉक्टरचे अश्लील व्हिडीओ

क्रीडा विश्वाला हादरवून सोडणारी आणि अत्यंत संतापजनक अशी एक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. दोन क्रिकेटपटूंनी एका

Jabalpur Cruise: जबलपूर क्रूझ दुर्घटनेत 9 जणांचा करुण अंत, माय-लेकाचा 'तो' क्षण काळीज पिळवटून टाकणारा; नेमकं काय घडलं ?

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील जबलपूर इथलं लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या बर्गी धरणावर गुरुवारी रात्री एका

LPG Gas Price Hike : महागाईचा भडका! तब्बल ९९३ रुपयांनी महागला गॅस सिलेंडर; जाणून घ्या एका सिलेंडरसाठी किती रुपये मोजावे लागणार?

मुंबई : मे महिन्याच्या सुरुवातीलाच तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला आहे. १९ किलोच्या व्यावसायिक

Madhya Pradesh Narmada cruise accident : बरगी धरणात क्रूझ बुडाले, ४ जणांचा मृत्यू,१०-१५ बेपत्ता

मध्यप्रदेशच्या जबलपूर येथील बरगी धरण परिसरात अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यांमुळे एक मोठा अपघात घडला.