Malnutrition problem in Melghat : मेळघाटात कुपोषणाचा प्रश्न ‘जैसे थे’

दासबर्ग क्लिनिक प्रतिनिधींच्या अभ्यास दौऱ्यातून स्पष्ट


मुंबई : मेळघाट आदिवासी पट्ट्यात बालक आणि माता यांच्यातील कुपोषणाचा प्रश्न (Malnutrition problem in Melghat) ऐरणीवर आला आहे. शासनाच्या सर्व योजना त्या ठिकाणी कार्यन्वित असून देखील कुपोषणाचा प्रश्न सुटत नाही. आजही येथील आदिवासी पाड्यांवरील नवजात बालके सॅम तसेच मॅमच्या वर्गवारीत मोडत आहेत, तर नवविवाहिता वेळेआधीच माता होत असल्याने त्या देखील कुपोषित असतात. यामुळे नवजात बालकांना पोषण आहार मिळत नाही. येथील नवजात बालके तसेच माता यांच्या कुपोषणामागे दडलेल्या कारणांचा शोध दासबर्ग क्लिनिककडून शोधण्यात आली. या क्लिनिकच्या अभ्यासानुसार शासन सर्व प्रकारचे अन्न, कपडे, औषधी पुरवत असले तरी सरकारी मार्गदर्शक तत्वांचे स्वीकृतीचा अभाव असून येथील आदिवासी अजूनही रुढी परंपराच्या काही गैरसमजांमुळे सर्वच आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास कचरत असल्याचे निरीक्षण मांडण्यात आले.


दरम्यान दासबर्ग क्लिनिककडून यावर प्रतिबंधात्मक कार्यक्रमही आखला असल्याचे सांगण्यात आले. या क्लिनिकचे डॉ. सुनील लांबे, डॉ. दिनक जैन, समाजसेवक गणेश लंबे, कमलेश यादव, जी. मुदलियार या टीमने मेळघाटात ग्राऊंड झिरो अहवाल सादर केला आहे. याला टेंब्रू सोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पिंपळकर व आदिवासी भागातील समाजसेवक बंड्या साने यांचे मार्गदर्शन लाभले. नुकतेच २६ ऑगस्ट २०२३ रोजी आदिवासी भागाला भेट देण्यात आली. येथील आदिवासी पाड्यांवर फिरून सरकारी सुविधांची स्थिती पाहिली. मात्र सरकारी योजना उत्तमरित्या राबवित असल्याचे दिसून आले. तरीही बालक आणि नवमातांमधील कुपोषणाचा प्रश्न दिसून येत असल्याचे दासबर्गचे डॉ. सुनील लांबे यांनी सांगितले. या ठिकाणी मुलींची लग्न वेळेआधी होत असल्याने लग्नानंतर नको त्या वयातच नैसर्गिकरित्या गर्भधारणा होते. हा गर्भधारणेचा दर मुलांची काळजी घेण्याच्या क्षमतेपेक्षा थोडा अधिकच आहे. हाच कळीचा मुद्दा असून यावर काम करण्याची गरज असल्याचे डॉ. लांबे यांनी स्पष्ट केले.



उपाययोजना...


या औषधांमुळे सर्व काही पचवण्याची तयारी, प्रत्येक माता आणि अर्भक केवळ होमिओपॅथी औषधांनीच शक्य होऊ शकते, असे सांगत या कुपोषणावर उपाय सांगत यातून शासनाची उद्दिष्ट आणि ध्येय गाठली जाऊ शकतात. काही मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब केल्यास वर्ष दोन वर्षात कुपोषणाचे समूळ उच्चाटन होऊ शकते, असे दासबर्ग क्लिनिकच्या तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. हे औषध इम्यून बुस्टरच काम करत असून बालकांमधील उलटी, जुलाब, सर्दी, खोकला न्युमोनियासारख्या सतत होणाÚऱ्या आजारांवर उपाय ठरू शकतो. यातून प्रतिकार क्षमता वाढते. आजरपण गेल्याने त्यांचे पोषणक्षमता वाढू शकते.

Comments
Add Comment

10th-12 Board Exam 2026: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल

ठाणे: आजपासून म्हणजेच मंगळवार १० फेब्रुवारी पासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. तर २० फेब्रुवारी

150 days E-Governance Reform Program: ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातील उत्कृष्ट जिल्हा परिषदा

मुंबई: राज्यातील शासकीय कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी राबवण्यात आलेल्या १५०

CM Devendra Fadnavis Delhi Visit: मुख्यमंत्री फडणवीसांच्या तातडीच्या दिल्ली दौऱ्यावर विशेष लक्ष, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर निर्णय होणार?

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Palghar: आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटीलचा भीषण अपघातात मृत्यू

पालघर: भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणारा नेमबाज संभाजी शिवाजी पाटील याचा वयाच्या २७ व्या

Government Job: राज्यात ७० हजार पदांची भरती होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई : महाराष्ट्रात लवकरच ७० हजार पदांची नोकरभरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री

Dada Bhuse : 'परीक्षा ही सुंदर प्रवासाची सुरुवात; आत्मविश्वासाने सामोरे जा', मा.शिक्षण मंत्री श्री .दादाजी भुसे यांचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि