केंद्रातील अधिकाऱ्यांनी दिल्ली सोडू नये

Share

विशेष अधिवेशनासाठी मोदी सरकारचे आदेश

नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशन काळात केंद्र सरकारचे सर्व उच्चपदस्थ अधिकारी, सचिव, कॅबिनेट सचिव यांनी दिल्लीत राहणे अपेक्षित आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या परवानगीशिवाय कोणत्याही विभागाचा सचिव दिल्लीबाहेर जाणार नाही, असे सक्त आदेश केंद्र सरकारने काढले आहेत. केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे.

घोषणा झाल्यापासून दिल्लीतील घडामोडींना वेग आला आहे. आज सकाळी ‘एक देश एक निवडणुकी’साठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली. त्यानंतर भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा हे रामनाथ कोविंद यांच्या भेटीला गेले. त्यानंतर आता अधिवेशन काळात केंद्र सरकारचे सर्व उच्चपदस्थ अधिकारी, सचिव, कॅबिनेट सचिव यांना दिल्ली न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकापाठोपाठ एक वेगाने घडणाऱ्या घटना पाहून नेमके अधिवेशन काळात काय घडणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. विशेष अधिवेशात भाजपच्या सर्व खासदारांनी आपली कामे रद्द केल्याची माहिती मिळत आहे.

‘वन नेशन, वन इलेक्शन’ संदर्भात पंतप्रधान मोदी २०१६पासून भाष्य करत आहे. विशेष अधिवेशन काळात वन नेशन वन इलेक्शन संदर्भात निर्णय होणार का? कारण निवडणूक आयोगाने देखील एक महत्त्वाची घोषणा केली आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्याच्या विधानसभा निवडणुका येत्या डिसेंबर महिन्यातच पार पडणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान विधानसभा निवडणुकांची मुदत डिसेंबरला संपणार आहे. त्यामुळे इतक्या कमी वेळेत निवडणूक शक्य आहे का? भाजपने २००४ साली असा लवकर निवडणुका घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांना याचा फटका बसला होता. आता २० वर्षांनी भाजप पुन्हा प्रयत्न करणार का? मुदतपूर्व निवडणुका होतील का? असे अनेक प्रश्न उपस्थित
होत आहे.

Recent Posts

Pahalgam Terror Attack : चौघांची ओळख पटली; दोन पाकिस्तानी, दोन स्थानिक

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…

22 minutes ago

Abir Gulaal : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ‘या’ चित्रपटावर बंदीची मागणी

मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…

24 minutes ago

पहलगाममध्ये सात अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू, तीन अतिरेक्यांचे रेखाचित्र प्रसिद्ध

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…

1 hour ago

Pahalgam Terror Attack : आता मलाही मारा ना…! काल लग्न झालं अन् आज घरातून तिरडी उठणार

१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…

2 hours ago

Chardham Yatra Scam : चारधाम यात्रेला जाताय सावधान! भाविकांची होतेय मोठी फसवणूक

देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…

2 hours ago