Monsoon: सप्टेंबरमध्ये पुन्हा परततोय पाऊस, हवामान विभागाची महत्त्वाची बातमी

नवी दिल्ली : भारतात १९०१ नंतर ऑगस्ट महिन्यात यावेळेस सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने प्रतीक्षाच करायला लावली. यातच भारतीय हवामान विभागाने दिलासादायक बातमी दिली आहे. अत्यंत धीमी झालेल्या पावसाच्या हालचाली सप्टेंबरमध्ये वेगवान होऊ शकतात. अनेक दशकानंतर ऑगस्टमध्ये पावसाची सगळ्यात कमी नोंद पाहायला मिळाली.


हवामान विभागाच्या माहितीनुसार दक्षिण -पश्चिम मान्सून या आठवड्यात पुन्हा सक्रिय होऊ शकतो आणि देशाच्या मध्य तसेच दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये पाऊस होऊ शकतो. डिजीटल माध्यमांशी संवाद साधताना भारतीय हवामान खात्याच्या विभागाचे संचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की सप्टेंबरमध्ये सामान्य पाऊस होण्याची शक्यता आहे.


जरी सप्टेंबरमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळला तरी जून ते सप्टेंबर या सत्रात नोंदला गेलेला पाऊस हा सरासरीच्या तुलनेत कमीच राहण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये पाऊस कमी राहण्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे भूमध्यरेखीय प्रशांत महासारगात अलनिनोची स्थिती बनणे.


दरम्यान, अल निनोवर उलटा परिणाम करणारे तापमान बनण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे अल निनोचा प्रभाव कमी होईल. यामुळे पूर्व दिशेला वाहणाऱ्या ढगांची हती आणि उष्णकटिबंधीय क्षेत्रात होणारा पाऊस पुन्हा येण्यास कारणीभूत ठरू शकतो.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात