One nation, one election : एक देश एक निवडणुकीसाठी केंद्र सरकारकडून समिती स्थापन

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद समितीचे अध्यक्ष


नवी दिल्ली : 'एक देश एक निवडणुक' (One nation, one election) संदर्भात केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. आजवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अनेकदा ही संकल्पना मांडली आहे. आता त्यावर कएक पाऊल पुढे टाकत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती कायद्यातील सर्व बाबींचा विचार करेल. एक देश एक निवडणूक घेता येईल का या बाबींचा अभ्यास करण्यासाठी या महत्वाच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे.


पावसाळी अधिवेशनानंतर कालच अचानक जाहीर करण्यात आलेल्या पाच दिवसांच्या संसदेच्या विशेष सत्रामागे हेच कारण आहे का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने 'एक देश एक निवडणुकी'चा मुद्दा उपस्थित करत आहेत. देशातील विविध राज्यांत निवडणुकींवर होणारा खर्च कमी करण्यासाठी ही संकल्पना मांडण्यात आली आहे. परंतु एकाच वेळी अशा पद्धतीने निवडणूक झाल्यास संघराज्य पद्धतीवर परिणाम होईल, असे प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात आले. त्यामुळे एक देश एक निवडणूक कधी आणि कशा प्रकारे लागू करण्यात येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Hindu religion : धर्मांतरित हिंदूंच्या मनात जर खरी श्रद्धा असेल, तर त्यांना मंदिरात प्रवेश करण्याचा आणि पूजा करण्याचा अधिकार

नवी दिल्ली : जर एखादी व्यक्ती जन्माने हिंदू (Hindu) नसतानाही तिला मंदिरात प्रवेश नाकारला जाऊ शकतो का? याबाबत ती

थायलंडमध्ये भारतीय युद्धनौकांचा संयुक्त सराव; सागरी सुरक्षेसाठी वाढला समन्वय

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी

अरुणाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलन; १४ गावांतील ३१०० हून अधिक नागरिक बाधित

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील लोअर सियांग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या ढगफुटी आणि भूस्खलनामुळे

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी