One nation, one election : एक देश एक निवडणुकीसाठी केंद्र सरकारकडून समिती स्थापन

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद समितीचे अध्यक्ष


नवी दिल्ली : 'एक देश एक निवडणुक' (One nation, one election) संदर्भात केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. आजवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अनेकदा ही संकल्पना मांडली आहे. आता त्यावर कएक पाऊल पुढे टाकत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती कायद्यातील सर्व बाबींचा विचार करेल. एक देश एक निवडणूक घेता येईल का या बाबींचा अभ्यास करण्यासाठी या महत्वाच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे.


पावसाळी अधिवेशनानंतर कालच अचानक जाहीर करण्यात आलेल्या पाच दिवसांच्या संसदेच्या विशेष सत्रामागे हेच कारण आहे का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने 'एक देश एक निवडणुकी'चा मुद्दा उपस्थित करत आहेत. देशातील विविध राज्यांत निवडणुकींवर होणारा खर्च कमी करण्यासाठी ही संकल्पना मांडण्यात आली आहे. परंतु एकाच वेळी अशा पद्धतीने निवडणूक झाल्यास संघराज्य पद्धतीवर परिणाम होईल, असे प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात आले. त्यामुळे एक देश एक निवडणूक कधी आणि कशा प्रकारे लागू करण्यात येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी