Kanya Sumangala Yojana: या राज्यात मुलींच्या जन्मानंतर आता मिळणार २५ हजार रूपये

  181

लखनऊ: रक्षाबंधनाच्या निमित्ताने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (up cm yogi adityanath) यांनी मुलींसाठी मोठी घोषणा केली आहे. बुधवारी लोकभवन येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजनेच्या(kanya sumangal yojna) लाभार्थींशी संवाद कार्यक्रमादरम्यान त्यांनी या योजनेतील रकमेत वाढ करत असल्याची घोषणा केली.


सीएम योगी म्हणाले, डबलल इंजिनचे सरकार आर्थिक वर्ष २०१४-२५पासून कन्या सुमंगल योजनेची रक्कम १५ हजारांवरून वाढवून २५ हजार करत आहे. यामुळे मुलींना आपली स्वप्ने पूर्ण करणे अधिक सोपे होईल तसेच त्या शिक्षित बनण्यासोबतच आत्मनिर्भर बनतील.



मुलीच्या जन्मानंतर लगेचच मिळणार ५ हजार रूपये


कार्यक्रमात सीएम योगी म्हणाले, आधी या योजनेंतर्गत सहा टप्प्यात १५ हजार रूपये दिले जात होते. मात्र पुढील वर्षांपासून मुलीचा जन्म होताच तिच्या खात्यात तातडीने ५ हजार रूपये दिले जाणार. यासोबतच मुलगी एक वर्षाची झाली की दोन हजार रूपये, मुलगी पहिलीला गेली की तीन हजार रूपये, सहाव्या इयत्तेत गेल्यानंतर तीन हजार रूपये, नवव्या इयत्तेत जाताच पाच हजार रूपये आणि मुलीने ग्रॅज्युएशन अथवा डिप्लोमा अथवा सर्टिफिकेटचा कोणता कोर्स केल्यास तिच्या खात्यात सात हजार रूपये दिले जाणार.


सीएम योगी म्हणाले, आज उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजनेच्या माध्यमातून १६,२४०,०० हजार मुलींना लाभ होत आहे.



निरक्षर महिलांना मिळणार रेशन कार्ड


मुख्यमंत्री योगी म्हणाले, डबल इंजिनचे सरकारचे अशे म्हणणे आहे की मुलगी केवळ मुलगी आहे. तिच्यासोबत कोणत्याही स्तरावर भेदभाव झाला नाही पाहिजे. तिला सुरक्षा, संरक्षण आणि पुढे जाण्याच्या संधी मिळाल्या पाहिजे. त्यांना रेशन कार्ड, आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळायला हवा.

Comments
Add Comment

पंतप्रधान मोदींची पदवी सार्वजनिक करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने केले रद्द

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवीची माहिती सार्वजनिक करण्याचे केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी)

भटक्या कुत्र्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला

नवी दिल्ली : दिल्लीच्या शकरपूर भागात भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा

जैसलमेरमध्ये खोदकामात आढळले २०१ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या फायटोसॉरचे जीवाश्म

जैसलमेर: राजस्थानमधील एका गावात तलावाजवळ डायनासॉर काळातील जीवाश्म सापडले असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत

हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस! पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री