Kanya Sumangala Yojana: या राज्यात मुलींच्या जन्मानंतर आता मिळणार २५ हजार रूपये

  180

लखनऊ: रक्षाबंधनाच्या निमित्ताने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (up cm yogi adityanath) यांनी मुलींसाठी मोठी घोषणा केली आहे. बुधवारी लोकभवन येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजनेच्या(kanya sumangal yojna) लाभार्थींशी संवाद कार्यक्रमादरम्यान त्यांनी या योजनेतील रकमेत वाढ करत असल्याची घोषणा केली.


सीएम योगी म्हणाले, डबलल इंजिनचे सरकार आर्थिक वर्ष २०१४-२५पासून कन्या सुमंगल योजनेची रक्कम १५ हजारांवरून वाढवून २५ हजार करत आहे. यामुळे मुलींना आपली स्वप्ने पूर्ण करणे अधिक सोपे होईल तसेच त्या शिक्षित बनण्यासोबतच आत्मनिर्भर बनतील.



मुलीच्या जन्मानंतर लगेचच मिळणार ५ हजार रूपये


कार्यक्रमात सीएम योगी म्हणाले, आधी या योजनेंतर्गत सहा टप्प्यात १५ हजार रूपये दिले जात होते. मात्र पुढील वर्षांपासून मुलीचा जन्म होताच तिच्या खात्यात तातडीने ५ हजार रूपये दिले जाणार. यासोबतच मुलगी एक वर्षाची झाली की दोन हजार रूपये, मुलगी पहिलीला गेली की तीन हजार रूपये, सहाव्या इयत्तेत गेल्यानंतर तीन हजार रूपये, नवव्या इयत्तेत जाताच पाच हजार रूपये आणि मुलीने ग्रॅज्युएशन अथवा डिप्लोमा अथवा सर्टिफिकेटचा कोणता कोर्स केल्यास तिच्या खात्यात सात हजार रूपये दिले जाणार.


सीएम योगी म्हणाले, आज उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजनेच्या माध्यमातून १६,२४०,०० हजार मुलींना लाभ होत आहे.



निरक्षर महिलांना मिळणार रेशन कार्ड


मुख्यमंत्री योगी म्हणाले, डबल इंजिनचे सरकारचे अशे म्हणणे आहे की मुलगी केवळ मुलगी आहे. तिच्यासोबत कोणत्याही स्तरावर भेदभाव झाला नाही पाहिजे. तिला सुरक्षा, संरक्षण आणि पुढे जाण्याच्या संधी मिळाल्या पाहिजे. त्यांना रेशन कार्ड, आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळायला हवा.

Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे