लग्नबंधनात अडकणार होते मात्र अचानक हॉटेलमध्ये लागली आग आणि...

भुज: मुंबईच्या(mumbai) एका हॉटेलमध्ये रविवारी हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत एनआयआर किशन हलाई आणि त्याची भावी पत्नी २५ वर्षीय रुपाली वेकारिया यांचा मृत्यू झाला. किशन आणि रूपाली यांचे लग्न होणार होते. त्यासाठी ते मुंबईतील एका हॉटेलमध्ये थांबले होते. मात्र नशिबाला हे मान्य नव्हते. आगीच्या या दुर्घटनेत हलाई आणि वेकारिया यांच्यासह तीन लोकांचा मृत्यू झाला.


गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील मांडवी तालुक्याच्या रूपनगर गावाचे सरपंच सुरेश कारा यांनी दिलेल्या माहितीनुसार हलाई, रूपल, त्यांची आई आणि बहीण सांताक्रुझ येथील चार मजल्याच्या गॅलॅक्सी हॉटेलमध्ये थांबले होते. त्यांच्या विमानाच्या उड्डाणाच्या वेळेत बदल झाल्याने त्यांची व्यवस्था या हॉटेलमध्ये करण्यात आली होती.


रविवारी दुपारी हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली. या आगीत किशन हलाई, रूपल वेकारिया आणि कांतिलाल वारा यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत रूपलची आई मंजुलाबेन, बहीण अल्पा आणि अस्लम शेख हे जखमी झाले.


काराने सांगितले की हलाई आणि त्याची भावी पत्नी रूपल वेकारिया अनेक वर्षांपासून नैरोबीला राहत होते. अनेक वर्षे परदेशात राहूनही ते आपल्या कुटुंबाशी जोडलेले होते. किशन आणि रूपल यांचा साखरपुडा झाला होता आणि नैरोबीला पोहोचल्यावर ते लग्न करणार होते. तेथे ते आपल्या आई-वडील तसेच बहीण-भावांसोबत राहत होते.


किशन, रूपल आणि त्यांचे कुटुंबीय किशनच्या छोट्या भावाच्या लग्नासाठी एक महिनाआधी भारतात आले होते. नैरोबीला जाण्यासाठी ते सगळे शनिवारी अहमदाबाद येथून मुंबईला पोहोचले. जेव्हा विमानाच्या उड्डाणाच्या वेळेत बदल झाला त्यामुळे विमान कंपनीने त्यांना सांताक्रुझ येथील हॉटेलमध्ये त्यांची व्यवस्था केली. या हॉटेलमध्ये रविवारी आग लागली.

Comments
Add Comment

Fire News : ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात भीषण अग्नितांडव

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात ( Hapur district of Uttar Pradesh ) भीषण अग्नितांडवाची घटना घडली आहे. आतापर्यंत या

भारतासाठी आनंदाची बातमी ! चीन, पाकिस्तानची झोपच उडणार ; भारत आणि रशियामध्ये मोठा करार

Big deal between India and Russia : भारत आणि रशिया या दोन देशांतील मैत्रीपूर्ण संबंध संपूर्ण जगाला माहित आहे. जगाचा विरोध धुडकावत कधी

Heat Wave: पुढील तीन दिवस जरा जपूनच ! राज्यातील 'हे' शहर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत; नाशिकची स्थिती काय ?

Maharashtra Weather Update : राज्यभरात तपमानानं कहर केल्याचे चित्र आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या

West Bengal Election 2026 : विक्रमी मतदानामुळे ममता बॅनर्जींचे सरकार संपुष्टात येईल - अमित शाह

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्यातील राणाघाट येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Karnataka : पादचारी पूल कोसळला, आठ जखमी

मंगळुरू : कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री तालुक्यात एक अरुंद पादचारी पूल कोसळला. या

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये ठिकठिकाणी ईडीच्या धाडी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राजधानी कोलकात्यात