Asia cup 2023: श्रीलंकेचा बांगलादेशवर ५ विकेट राखून विजय

पल्लेकल: आशिया चषक २०२३मधील (asia cup 2023) दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशवर ५ विकेट राखून विजय मिळवला आहे. बांगलादेशने पहिल्यांदा फलंदाजी करताना १६४ धावा केल्या. श्रीलंकेच्या तिखट माऱ्यासमोर बांगलादेशच्या संघाला २०० धावांचा पल्लाही गाठता आला नाही.


त्यानंतर श्रीलंकेने १६५ धावांचे आव्हान ३९ ओव्हरमध्ये ५ विकेट राखत पूर्ण केले. श्रीलंकेच्या चरिथ असलंकाने सर्वाधिक ६२ धावांची खेळी केली. तर सदिरा समारवीक्रमाने ५४ धावांची खेळी करत संघाला आव्हान पूर्ण करण्यात मदत केली. श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. त्यांचे पहिले तीन विकेट झटपट गेले. त्यामुळे श्रीलंकेचा संघ थोड्या दबावात मात्र श्रीलंकेच्या चरिथ असलंका आणि सदिरा समारवीक्रमाने संयम राखत चांगली भागीदारी रचली आणि संघाला विजय मिळवून दिला.


तत्पूर्वी, बांगलादेशने पहिल्यांदा फलंदाजी करताना ४२.४ षटकांत सर्वबाद १६४ धावा केल्या होत्या. बांगलादेशकडून केवळ एकाच खेळाडूला मोठी खेळी करता आली. बांगलादेशच्या नजमुल हौसेन सांतोने ८९ धावांची खेळी केली. इतर कोणत्याही फलंदाजांना चांगली खेळी करता आली नाही.


याआधीच्या ग्रुप ए मधील पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील सामन्यात पाकिस्तानने नेपाळला चांगलेच धुतले. पाकिस्तानने नेपाळवर २५८ धावांनी विजय मिळवला.

Comments
Add Comment

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल

सेमीफायनल सामन्यात काळी पट्टी बांधून खेळतायेत खेळाडू... कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे.

सेमी फायनलसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल ; ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वन डे वर्ल्ड कप २०२५ चा सेमी फायनल सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील