Asia Cup 2023: तर भारत-पाकिस्तान सामना होऊ शकतो रद्द...जाणून घ्या कारण

मुंबई: आशिया चषकाची (asia cup 2023) सुरूवात पाकिस्तानी संघाने(pakistan team) जबरदस्त केली आहे. कर्णधार बाबर आझमने नेपाळविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात जबरदस्त शतकी खेळी केली. स्पर्धेच्या १६व्या हंगामातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने ग्रुप ए मधील सामन्यात नेपाळवर २३८ धावांनी मोठा विजय मिळवला. हा आशिया चषकातील पाकिस्तानचा मोठा विजय आहे.


बाबर आझम आणि इफ्तिखार अहमद यांच्या शतकांच्या जोरावर पाकिस्तानने सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ३४२ धावांचा स्कोर उभा केला होता. प्रत्युत्तरात नेपाळचा संघ केवळ १०४ धावांवर कोसळला. लेग स्पिनर शादाब खानने ४ विकेट मिळवल्या. आता पाकिस्तानचा ग्रुप राऊंडमधील पुढील सामना २ सप्टेंबरला होणार आहे.


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २ सप्टेंबरला शनिवारी श्रीलंकेच्या कँडीमध्ये खेळवला जाणार आहे. या दिवशी ९० टक्के पावसाची शक्यता आहे. अशातच सामना रद्दही होऊ शकतो. याचा फायदा पाकिस्तान आणि बाबर आझम यांना मिळेल. Weather.com च्या माहितीनुसार कँडीमध्ये २ सप्टेंबरला केवळ पाऊसच पडणार नाही तर जोरदार वारेही वाहण्याची शक्यता आहे तसेच दिवसभर ढग राहतील. अशातच मैदान ओले झाल्यास ते सुकण्याची शक्यता कमी आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.



पाकिस्तानचा संघ पोहोचणार सुपर ४मध्ये


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना एक एक पॉईंट मिळेल. सामन्यासाठी कोणताही रिझर्व्ह डे ठेवण्यात आलेला नाही. अशातच पाकिस्तानचे २ सामन्यात ३ गुण होतील. तर टीम सुपर ४ साठी क्वालिफाय करतील. तर ४ सप्टेंबरला भारत आणि नेपाळ यांच्यात होणाऱ्या सामन्याचा विजेता सुपर ४मध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरेल.

Comments
Add Comment

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

कटकमध्ये भारताचा १०१ धावांनी विजय, दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव

कटक : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेत भारताने विजयाने शुभारंभ केला. भारताने कटकमध्ये झालेला सामना १०१

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

IPL 2026 Players Auction : अंतिम यादी जाहीर; ७७ जागांसाठी ३५० खेळाडूंवर बोली, त्यापैकी २४० भारतीय

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा २०२६ चा खेळाडू लिलाव १६ डिसेंबरला अबुधाबी येथे होणार असून, या वेळी एकूण ३५०

IPL 2026 Auction: टॉप 5 गटात 34 खेळाडूंवर लागणार बोली

IPL 2026 मिनी लिलावासाठी एकूण 350 खेळाडूंची नावं निश्चित करण्यात आलेली आहे . टॉप खेळाडूंसाठी पाच गट करण्यात आले आहेत.

Fruad In Cricket : क्रिकेटविश्वातला महाघोटाळा, एकाच पत्त्यावर आढळले १२ खेळाडू

पुद्दुचेरी : भारतीय क्रिकेटचा जागतिक पातळीवर दबदबा आहेच. बीसीसीआयची आर्थिक ताकद, आयपीएलसारख्या जगातील सर्वात