मुंबई: आशिया चषकाची (asia cup 2023) सुरूवात पाकिस्तानी संघाने(pakistan team) जबरदस्त केली आहे. कर्णधार बाबर आझमने नेपाळविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात जबरदस्त शतकी खेळी केली. स्पर्धेच्या १६व्या हंगामातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने ग्रुप ए मधील सामन्यात नेपाळवर २३८ धावांनी मोठा विजय मिळवला. हा आशिया चषकातील पाकिस्तानचा मोठा विजय आहे.
बाबर आझम आणि इफ्तिखार अहमद यांच्या शतकांच्या जोरावर पाकिस्तानने सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ३४२ धावांचा स्कोर उभा केला होता. प्रत्युत्तरात नेपाळचा संघ केवळ १०४ धावांवर कोसळला. लेग स्पिनर शादाब खानने ४ विकेट मिळवल्या. आता पाकिस्तानचा ग्रुप राऊंडमधील पुढील सामना २ सप्टेंबरला होणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २ सप्टेंबरला शनिवारी श्रीलंकेच्या कँडीमध्ये खेळवला जाणार आहे. या दिवशी ९० टक्के पावसाची शक्यता आहे. अशातच सामना रद्दही होऊ शकतो. याचा फायदा पाकिस्तान आणि बाबर आझम यांना मिळेल. Weather.com च्या माहितीनुसार कँडीमध्ये २ सप्टेंबरला केवळ पाऊसच पडणार नाही तर जोरदार वारेही वाहण्याची शक्यता आहे तसेच दिवसभर ढग राहतील. अशातच मैदान ओले झाल्यास ते सुकण्याची शक्यता कमी आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना एक एक पॉईंट मिळेल. सामन्यासाठी कोणताही रिझर्व्ह डे ठेवण्यात आलेला नाही. अशातच पाकिस्तानचे २ सामन्यात ३ गुण होतील. तर टीम सुपर ४ साठी क्वालिफाय करतील. तर ४ सप्टेंबरला भारत आणि नेपाळ यांच्यात होणाऱ्या सामन्याचा विजेता सुपर ४मध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरेल.
दिवसभरातील (Prahaar Bulletin) महत्वाच्या बातम्या… टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले…
राज्य मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय मुंबई : सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर आता…
प्रश्नपत्रिका तयार करतानाच घेणार 'ही' खास काळजी मुंबई : NEET PG परीक्षा रद्द झाल्यानंतर जवळपास…
यांचा वारीतला सहभाग केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपाच्या माजी खासदारांची विरोधकांवर बोचरी टीका सोलापूर : आषाढी…
आमदार नितेश राणे यांचा रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला कोणाची बुद्धी लहान याबाबत राहुल गांधी आणि…
भोलेबाबा करायचा दुधाची अंघोळ; खीर बनवून वाटला जायचा प्रसाद लखनऊ : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या…