Raksha Bandhan 2023: कधी बांधावी राखी, काय आहे मुहूर्त, घ्या जाणून...

मुंबई: ऱक्षाबंधनाचा सण हा हिंदू परंपरेतील महत्त्वाचा सण मानला जातो. बहीण-भावाचे प्रेम जपणारा असा हा सण आहे. दरवर्षी रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पोर्णिमा तिथीला साजरा केला होता. काही लोकांचे म्हणणे आहे ३० ऑगस्टच्या दिवशी संपूर्ण दिवस भद्रा राहणार आहे त्यामुळे ३१ ऑगस्टला राखी बांधली जाऊ शकते. तर ज्योतिषांच्या मते ३० ऑगस्टला भद्रा असतानाही राखी बांधता येऊ शकते.

३० ऑगस्टला भद्रेची छाया


यावेळेस ३० ऑगस्टला भद्रेची छाया असणार आहे. शास्त्रांनुसार श्रावण महिन्यातील पोर्णिमा तिथीला दुपारी राखी बांधली पाहिजे मात्र दुपारी भद्रकाल असल्याने त्यावेळेस राखी बांधू नये. यावेळेस भद्रा ३० ऑगस्टला पोर्णमा तिथी सुरू होण्यासोबतच १० वाजून ५९ मिनिटांनी सुरू होत आहे. ३० ऑगस्ट म्हणजेच रात्री ९ वाजून २ मिनिटांपर्यंत भद्रकाल राहणार आहे.

हा आहे राखी बांधण्याचा मुहूर्त


जर तुम्हाला ३० ऑगस्टला राखी बांधायची आहे तर केवळ रात्री ९ वाजून २ मिनिटांनी बांधू शकता. ज्यांना काही कारणामुळे ३० ऑगस्टला राखी बांधता येणार नाही ते लोक ३१ ऑगस्टला सकाळी ७ वाजून ५ मिनिटांपर्यंत राखी बांधू शकतात.

रक्षाबंधनाच्या दिवशी करा हे काम


सगळ्यात आधी भावाला पूर्व अथवा उत्तरेच्या दिशेला तोंड करून बसवा. आधी भावाला टिळा लावा. त्यानंतर राखी बांधा आणि आरती ओवाळा. यानंतर त्याला गोड पदार्थ भरवून मंगल कामना करा. तर भावानेही बहिणीला काहीतरी गिफ्ट द्यावे.
Comments
Add Comment

महापालिकेच्या मुलांना आता चॉकलेटस्वरुपातील एनर्जी बार

पोषक आहारांतर्गत खिचडीसह या एनर्जी बार दिले जाणार मुलांना एनर्जी बारसाठी १४१ कोटी रुपये खर्च केले जाणार

सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती

मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व

तलाठी, तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांवर आता दक्षता पथकांचा ‘वॉच’

मुंबई : सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाप्रती आपलेपणा वाटावा, तसेच कामे गतिमान व्हावी, या उद्देशाने महसूल

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात

मुंबई : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार