Raksha Bandhan 2023: कधी बांधावी राखी, काय आहे मुहूर्त, घ्या जाणून...

मुंबई: ऱक्षाबंधनाचा सण हा हिंदू परंपरेतील महत्त्वाचा सण मानला जातो. बहीण-भावाचे प्रेम जपणारा असा हा सण आहे. दरवर्षी रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पोर्णिमा तिथीला साजरा केला होता. काही लोकांचे म्हणणे आहे ३० ऑगस्टच्या दिवशी संपूर्ण दिवस भद्रा राहणार आहे त्यामुळे ३१ ऑगस्टला राखी बांधली जाऊ शकते. तर ज्योतिषांच्या मते ३० ऑगस्टला भद्रा असतानाही राखी बांधता येऊ शकते.

३० ऑगस्टला भद्रेची छाया


यावेळेस ३० ऑगस्टला भद्रेची छाया असणार आहे. शास्त्रांनुसार श्रावण महिन्यातील पोर्णिमा तिथीला दुपारी राखी बांधली पाहिजे मात्र दुपारी भद्रकाल असल्याने त्यावेळेस राखी बांधू नये. यावेळेस भद्रा ३० ऑगस्टला पोर्णमा तिथी सुरू होण्यासोबतच १० वाजून ५९ मिनिटांनी सुरू होत आहे. ३० ऑगस्ट म्हणजेच रात्री ९ वाजून २ मिनिटांपर्यंत भद्रकाल राहणार आहे.

हा आहे राखी बांधण्याचा मुहूर्त


जर तुम्हाला ३० ऑगस्टला राखी बांधायची आहे तर केवळ रात्री ९ वाजून २ मिनिटांनी बांधू शकता. ज्यांना काही कारणामुळे ३० ऑगस्टला राखी बांधता येणार नाही ते लोक ३१ ऑगस्टला सकाळी ७ वाजून ५ मिनिटांपर्यंत राखी बांधू शकतात.

रक्षाबंधनाच्या दिवशी करा हे काम


सगळ्यात आधी भावाला पूर्व अथवा उत्तरेच्या दिशेला तोंड करून बसवा. आधी भावाला टिळा लावा. त्यानंतर राखी बांधा आणि आरती ओवाळा. यानंतर त्याला गोड पदार्थ भरवून मंगल कामना करा. तर भावानेही बहिणीला काहीतरी गिफ्ट द्यावे.
Comments
Add Comment

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी