Raksha Bandhan 2023: कधी बांधावी राखी, काय आहे मुहूर्त, घ्या जाणून...

मुंबई: ऱक्षाबंधनाचा सण हा हिंदू परंपरेतील महत्त्वाचा सण मानला जातो. बहीण-भावाचे प्रेम जपणारा असा हा सण आहे. दरवर्षी रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पोर्णिमा तिथीला साजरा केला होता. काही लोकांचे म्हणणे आहे ३० ऑगस्टच्या दिवशी संपूर्ण दिवस भद्रा राहणार आहे त्यामुळे ३१ ऑगस्टला राखी बांधली जाऊ शकते. तर ज्योतिषांच्या मते ३० ऑगस्टला भद्रा असतानाही राखी बांधता येऊ शकते.

३० ऑगस्टला भद्रेची छाया


यावेळेस ३० ऑगस्टला भद्रेची छाया असणार आहे. शास्त्रांनुसार श्रावण महिन्यातील पोर्णिमा तिथीला दुपारी राखी बांधली पाहिजे मात्र दुपारी भद्रकाल असल्याने त्यावेळेस राखी बांधू नये. यावेळेस भद्रा ३० ऑगस्टला पोर्णमा तिथी सुरू होण्यासोबतच १० वाजून ५९ मिनिटांनी सुरू होत आहे. ३० ऑगस्ट म्हणजेच रात्री ९ वाजून २ मिनिटांपर्यंत भद्रकाल राहणार आहे.

हा आहे राखी बांधण्याचा मुहूर्त


जर तुम्हाला ३० ऑगस्टला राखी बांधायची आहे तर केवळ रात्री ९ वाजून २ मिनिटांनी बांधू शकता. ज्यांना काही कारणामुळे ३० ऑगस्टला राखी बांधता येणार नाही ते लोक ३१ ऑगस्टला सकाळी ७ वाजून ५ मिनिटांपर्यंत राखी बांधू शकतात.

रक्षाबंधनाच्या दिवशी करा हे काम


सगळ्यात आधी भावाला पूर्व अथवा उत्तरेच्या दिशेला तोंड करून बसवा. आधी भावाला टिळा लावा. त्यानंतर राखी बांधा आणि आरती ओवाळा. यानंतर त्याला गोड पदार्थ भरवून मंगल कामना करा. तर भावानेही बहिणीला काहीतरी गिफ्ट द्यावे.
Comments
Add Comment

उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा

मुंबई : रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा शनिवार, २१ मार्च २०२६ रोजी दुपारी २

गिरगावच्या शोभायात्रेत स्वॅग दाखवणं व्हायरल गर्लला पडलं महागात; पोलिसांसह नागरिकही संतापले

गिरगावच्या शोभायात्रेत स्वॅग दाखवणं व्हायरल गर्लला पडलं महागात; पोलिसांसह नागरिकही संतापले मुंबईतील गिरगावसह

मिठीच्या सफाईची घाई; कंत्राटदारांच्या पाया पडणार की खात्यामार्फत करणार?

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आता कंपन्याच पुढे

Bomb Threat : मुंबई प्रेस क्लबला बॉम्बची धमकी; एका ईमेलमुळे खळबळ

- सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर मुंबई : मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला असून मुंबई प्रेस क्लबला (Mumbai Press Club) धमकीचा

मुंबई महापालिकेत विरोधकांची हवा गुल... काय आहे कारण जाणून घ्या

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आली असली तरी उबाठा आणि काँग्रेसच्या रुपात सक्षम विरोधी पक्ष असतानाही

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र