असा नकाशा बनवल्याने प्रदेश त्यांचा होत नाही, जयशंकर यांचे चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली: चीनने (china) जारी केलेल्या नव्या नकाशामध्ये अरूणाचल प्रदेश (arunachal pradesh) त्यांचा भूभाग असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र भारांताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. जयशंकर यांनी मंगळवारी एका न्यूज चॅनेलशी बोलताना चीनच्या या कावेगिरीबद्दल सांगितले, असे निरर्थक दावे करून दुसऱ्यांचा भूभाग आपला होत नाही. त्या प्रदेशावर दावा करण्याची चीनची जुनी सवय आहे. याने काही बदलणार नाही. त्यांनी जो नकाशा सादर केला त्याला काही अर्थ नाही.


चीनने सोमवारी नवा नकाशा जाहीर केल्यानंतर जयशंकर यांनी हे विधान केले आहे. चीनने सादर केलेल्या नकाशामध्ये अरूणाचल प्रदेश राज्य आणि अक्साई चीन भाग त्यांच्या भूभागाचा हिस्सा असल्याचे दाखवले. परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की आमचे सरकार याबाबत खूप स्पष्ट आहे की हे आमचे क्षेत्र आहे आणि तेथे आम्हाला काय करायचे आहे? अशा पद्धतीचे निरर्थक दावे करून दुसऱ्या लोकांचा प्रदेश तुमचा होत नाही.


गेल्या आठवड्यात चीनचे शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील अनौपचारिक बातचीतदरम्यान एलएसी आणि भारत-चीन सीमासह अन्या क्षेत्रांमवरील न सुटलेले मुद्दे उठले होते. पंतप्रधान मोदींनी जिनपिंग यांना भारताच्या चिंतांबाबत सांगितले होते.

Comments
Add Comment

हिंदूंना एकत्र करून हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी पदयात्रा: धीरेंद्र शास्त्री

आग्रा (उत्तर प्रदेश) : आध्यात्मिक नेते धीरेंद्र शास्त्री यांनी आज सांगितले की, हिंदूंना एकत्र करण्यासाठी, हिंदू

बिहारनंतर आता देशभरात लागू होणार 'SIR': निवडणूक आयोगाची दिल्लीत महत्त्वाची बैठक

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये चर्चेत आलेल्या एसआयआर (Systematic Integrity Review) प्रणालीचा आता संपूर्ण देशभरात एकाच

भारताच्या विरोधात कट? अमेरिकेचे लष्करी विमान थेट पाकिस्तानमध्ये उतरल्याने खळबळ

नवी दिल्ली: भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावपूर्ण असतानाच, अमेरिकन हवाई दलाचे एक मोठे लष्करी विमान थेट

प्रयागराजमध्ये गंगा नदीत तीन किशोरवयीन मुले बुडाली

प्रयागराज : प्रयागराज जिल्ह्यातील पुरामुफ्ती परिसरात आज गंगेत आंघोळीसाठी गेलेली तीन किशोरवयीन मुले बुडाली, असे

अयोध्येतील राम मंदिर उद्या दुपारनंतर राहणार बंद

अयोध्या : रविवारी चंद्रग्रहणामुळे रामनगरी अयोध्येतील रामललांचे दर्शन दुपारनंतर घेता येणार नाही. ग्रहणाचे वेध

आई-वडील, सासू-सास-यांसोबत वेळ घालवण्यासाठी मिळणार रजा!

गुवाहाटी: पालकांसोबत आणि सासरच्यांसोबत वेळ घालवण्यासाठी आसाम सरकारने नोव्हेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांना २