असा नकाशा बनवल्याने प्रदेश त्यांचा होत नाही, जयशंकर यांचे चोख प्रत्युत्तर

  83

नवी दिल्ली: चीनने (china) जारी केलेल्या नव्या नकाशामध्ये अरूणाचल प्रदेश (arunachal pradesh) त्यांचा भूभाग असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र भारांताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. जयशंकर यांनी मंगळवारी एका न्यूज चॅनेलशी बोलताना चीनच्या या कावेगिरीबद्दल सांगितले, असे निरर्थक दावे करून दुसऱ्यांचा भूभाग आपला होत नाही. त्या प्रदेशावर दावा करण्याची चीनची जुनी सवय आहे. याने काही बदलणार नाही. त्यांनी जो नकाशा सादर केला त्याला काही अर्थ नाही.


चीनने सोमवारी नवा नकाशा जाहीर केल्यानंतर जयशंकर यांनी हे विधान केले आहे. चीनने सादर केलेल्या नकाशामध्ये अरूणाचल प्रदेश राज्य आणि अक्साई चीन भाग त्यांच्या भूभागाचा हिस्सा असल्याचे दाखवले. परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की आमचे सरकार याबाबत खूप स्पष्ट आहे की हे आमचे क्षेत्र आहे आणि तेथे आम्हाला काय करायचे आहे? अशा पद्धतीचे निरर्थक दावे करून दुसऱ्या लोकांचा प्रदेश तुमचा होत नाही.


गेल्या आठवड्यात चीनचे शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील अनौपचारिक बातचीतदरम्यान एलएसी आणि भारत-चीन सीमासह अन्या क्षेत्रांमवरील न सुटलेले मुद्दे उठले होते. पंतप्रधान मोदींनी जिनपिंग यांना भारताच्या चिंतांबाबत सांगितले होते.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.