असा नकाशा बनवल्याने प्रदेश त्यांचा होत नाही, जयशंकर यांचे चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली: चीनने (china) जारी केलेल्या नव्या नकाशामध्ये अरूणाचल प्रदेश (arunachal pradesh) त्यांचा भूभाग असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र भारांताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. जयशंकर यांनी मंगळवारी एका न्यूज चॅनेलशी बोलताना चीनच्या या कावेगिरीबद्दल सांगितले, असे निरर्थक दावे करून दुसऱ्यांचा भूभाग आपला होत नाही. त्या प्रदेशावर दावा करण्याची चीनची जुनी सवय आहे. याने काही बदलणार नाही. त्यांनी जो नकाशा सादर केला त्याला काही अर्थ नाही.


चीनने सोमवारी नवा नकाशा जाहीर केल्यानंतर जयशंकर यांनी हे विधान केले आहे. चीनने सादर केलेल्या नकाशामध्ये अरूणाचल प्रदेश राज्य आणि अक्साई चीन भाग त्यांच्या भूभागाचा हिस्सा असल्याचे दाखवले. परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की आमचे सरकार याबाबत खूप स्पष्ट आहे की हे आमचे क्षेत्र आहे आणि तेथे आम्हाला काय करायचे आहे? अशा पद्धतीचे निरर्थक दावे करून दुसऱ्या लोकांचा प्रदेश तुमचा होत नाही.


गेल्या आठवड्यात चीनचे शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील अनौपचारिक बातचीतदरम्यान एलएसी आणि भारत-चीन सीमासह अन्या क्षेत्रांमवरील न सुटलेले मुद्दे उठले होते. पंतप्रधान मोदींनी जिनपिंग यांना भारताच्या चिंतांबाबत सांगितले होते.

Comments
Add Comment

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर

राष्ट्रपतींनी हेलिकॉप्टर 'प्रचंड'मधून केले उड्डाण

जैसलमेर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजस्थानमधील जैसलमेर येथून स्वदेशी विकसित लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर

WhatsApp लॉगिन फेल, मेसेज मिळेनात! मेसेजिंग अॅपमध्ये तांत्रिक बिघाडामुळे कामं ठप्प

WhatsApp वेब वापरकर्त्यांना त्यांच्या खात्यात लॉग-इन करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. Downdetector या संकेतस्थळावर या

Yogi Adityanath : सिंगापूर - जापान दौऱ्यात योगी आदित्यनाथ यांनी केले ₹९०,००० कोटींचे सामंजस्य करार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सिंगापूर आणि जपानचा चार दिवसांचा दौरा पूर्ण केला. दोन्ही

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान

फ्लाइट तिकीट रद्द करण्यावर आता शुल्क लागणार नाही; डीजीसीएने केला रिफंड नियमांमध्ये मोठा बदल

नवी दिल्ली :  विमान प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता विमान प्रवाशांना प्रवासी बुकिंगच्या ४८ तासांच्या