Team India: राहुल द्रविडच्या खुलाशाने खळबळ, वर्ल्डकपसाठी १८ महिने आधीच बनवला होता प्लान

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीमसाठी (team india) पुढील तीन महिने खूप महत्त्वाचे असणार आहेत. ३० ऑगस्टपासून आशिया कपची (asia cup) सुरूवात होत आहे आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये वनडे वर्ल्डकपसारख्या (world cup) मोठ्या स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत.


मात्र टीम इंडिया कोणत्या कॉम्बिनेशनसह या स्पर्धेत खेळणार आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यातच भारतीय क्रिकेट संघाचे प्रमुख कोच राहुल द्रविडने खुलासा केला आहे की त्यांनी १८ महिने आधीच ठरवले होते की वर्ल्डकपसाठी चौथ्या आणि पाचव्या नंबरवर कोण फलंदाजी करणार आहे. मात्र त्याची रणनीती कोणत्या कारणाने बिघडली याबाबतचे मोठे विधान केले आहे.



१८ महिन्यांआधी बनवलेल्या प्लानवर फिरवले पाणी


मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने म्हटले की वर्ल्डकपसाठी चौथ्या आणि पाचव्या नंबरवरील फलंदाज १८ महिन्यांआधीच ठरवण्यात आला होता. मात्र तीन प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त झाल्याने त्यांची रणनीती बिघडली. द्रविड म्हणाले, श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि ऋषभ पंत सारखे खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने संघ मॅनेजमेंटला याबाबत थोडे प्लान बदलावे लागले.


द्रविडने आशिया कपसाठी टीमच्या रवानगीने म्हटले, चौथ्या आणि पाचव्या नंबरसाठीच्या फलंदाजासांठी खूप चर्चा झाली आणि असे वाटते की जसे की आमच्याकडे याबाबत स्पष्टता नाही की या स्थानांवर कोण फलंदाजी करणार. मी तुम्हाला १८ ते १९ महिने आधी सांगू शकत होतो की या दोन स्थानांवर कोणते तीन खेळाडू फलंदाजी करतील.



टीम इंडियामध्ये या खेळाडूंची कमतरता


ऋषभ पंत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कार अपघातात दुखापतग्रस्त झाला होता तर अय्यर आणि राहुल अनुक्रमे पाठ आणि गुडघ्याच्या दुखापतीमुळे मार्च आणि मेमध्ये संघाबाहेर गेले होते. या दोघांना आता आशियाकपसाठी संघात निवडण्यात आले आहे. तर राहुल स्पर्धेच्या पहिल्या दोन सामन्यात बाहेर असतील.

Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख