Drought Relief Plan : दुष्काळात अडकलेल्या बळीराजाला वाचवण्यासाठी राज्य सरकारचे विशेष प्रयत्न

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री घेणार आढावा


मुंबई : राज्यभरात पावसाने पाठ फिरवल्यामुळे बळीराजा प्रचंड चिंतेत आहे. मराठवाड्यात तर बळीराजावर हातात तांब्या घेऊन त्याने थेंब थेंब पाणी घालून पिकांना वाढवण्याची वेळ आली आहे. मात्र, काही ठिकाणी प्यायलाही पाणी नसल्याने पिकांना कुठून पाणी आणायचे, या चिंतेने बळीराजा ग्रासला आहे. पिके करपून चालली आहेत पण पाऊस मात्र पडायचे नाव घेत नाही. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. यासाठी मंत्रालयात (Mantralaya) मुख्यमंत्र्यांच्या वॉर रुममध्ये (War room) दुष्काळ नियंत्रण वॅार रुम (Drought Control War Room) बनवण्यात येणार आहे.


मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांची वॅार रुम आहे. या वॅार रुममध्ये दुष्काळ नियंत्रण वॅार रुम बनवण्यात येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे या वॅार रुममधून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. दुष्काळाच्या उंबरठ्यावर असलेली गावे, तालुके, जिल्हे, विभाग यांवर नजर ठेवली जाणार आहे. त्यांना वॅार रुमशी जोडून त्यांना दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी उपाय योजना केल्या जाणार आहेत.



पाण्याचे आरक्षण केले जाणार


दुष्काळी परिस्थितीवर उपाय योजना म्हणून राज्यातील पाणी साठा आणि स्त्रोत यांच्या उपलब्धतेनुसार पाण्याचे आरक्षण केले जाणार आहे. नुकतंच राज्य सरकारने धरणातील पाणी साठ्याचे आरक्षण करण्याचे आदेश दिले होते. यानुसार उपलब्ध पाणी साठा पिण्यासाठी, शेतीसाठी, व्यावसायिक वापराकरता आरक्षित केला जाणार आहे. यासंबंधी विशेष अधिकारी नेमून आढावा घेतला जाणार आहे आणि त्यानुसार निर्णय घेतले जाणार आहेत. राज्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्याने यंदा राज्यातील काही भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवू शकते. यामुळे राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील

दक्षिण मुंबईतील बेलासीस पुलाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव; मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार ब्रिटिशांच्या

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानभवन येथे "जावे विनोदाच्या गावा" या कार्यक्रमाचे विशेष आयोजन

श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन "लोकसेवेचा लोकजागर" ग्रंथाचे प्रकाशन मुंबई : महाराष्ट्र

मुंबई महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार

ग्रीन ब्राँड्ससह सदनिकांची विक्री, करमणूक शुल्क, भूखंडाचा लिलावातून वाढवणार महसूलाची रक्कम मुंबई (विशेष

'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी राजभाषा दिन' यात फरक काय ?

मुंबई : दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' आणि १ मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' साजरा करतात. ज्येष्ठ कवी