Health Department: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी गुडन्यूज, आरोग्य विभागात मेगा भरती

मुंबई: बेरोजगार तरुणांसाठी राज्य सरकारने (state government) नोकरीची मोठी सुवर्णसंधी आणली आहे. गेल्या तीन वर्षांपासून आरोग्य विभागाची (health department) भरती प्रक्रिया रखडली होती. ही प्रक्रिया आता सुरू होणार आहे. आरोग्य विभागात तब्बल १० हजार ९४९ पदांची भरती केली जाणार आहे. ही माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली आहे.


आरोग्य विभागातील या भरतीसाठीची जाहिरात मंगळवारीच प्रसिद्ध केली जाणार आहे. २०२१मध्ये आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेवेळेस पेपरफुटीचा प्रकार घडला होता. त्यामुळे ही प्रक्रिया थांबवली गेली होती. त्यामुळे या सरकारवर या भरतीसाठी सरकारवर एकप्रकारचे दबाव होता.


त्यानंतर आता या महायुतीच्या सरकारमध्ये ही भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे जे बेरोजगार तरूण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नक्कीच फायदा होणार आहे.



या पदांसाठी भरती


या भरतीच्या प्रक्रियेत क आणि ड संवर्गातील विविध ६० प्रकारची मिळून एकूण १० हजार ९४९ पदे असणार आहेत. ही प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएसकडून राबवली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली.

Comments
Add Comment

त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाजप खासदाराच्या रेंज रोव्हरला भर रस्त्यात लागली आग

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अग्नितांडव सुरु आहे. अशातच आता त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन

म्हाडाकडे महापालिकेच्या मालमत्ता कराची ६३ कोटींची थकबाकी

मुंबई: मुंबई महापालिकेने आता मालमत्ता कराची थकीत रक्कम वसूल करण्याची मोहिम हाती घेत मोठ्या थकबाकीदारांना

सोमवारी महापालिका सभागृहनेते आणि विरोधी पक्षनेत्यांच्या नावाची घोषणा होणार

मुंबई: मुंबईचे महापौरआणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष सभागृहनेते आणि विरोधी

Mulund Metro Accident: मुलुंड मेट्रो स्लॅबप्रकरणी कार्यकारी अभियंता निलंबित; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली कारवाई

मुंबई: मेट्रो लाईन ४ (वडाळा-कासारवडवली) मार्गावर मुलुंड येथे शनिवारी झालेल्या दुर्घटने प्रकरणी उपमुख्यमंत्री

नेपियन्सी रोडचे होणार सिमेंट काँक्रिटीकरण, येत्या मंगळवारपासून कामाला सुरुवात

पावसाळ्यापूर्वी एका मार्गिकेचे करणार काम पूर्ण मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेमार्फत, मुकेश चौक ते

मुंबईत स्वच्छतेबाबतच्या स्पर्धा भरवणार, मुंबईला पहिल्या क्रमांकावर आणणार

भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी व्यक्त केला निर्धार मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आपण सर्वांनी मुंबई