Health Department: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी गुडन्यूज, आरोग्य विभागात मेगा भरती

मुंबई: बेरोजगार तरुणांसाठी राज्य सरकारने (state government) नोकरीची मोठी सुवर्णसंधी आणली आहे. गेल्या तीन वर्षांपासून आरोग्य विभागाची (health department) भरती प्रक्रिया रखडली होती. ही प्रक्रिया आता सुरू होणार आहे. आरोग्य विभागात तब्बल १० हजार ९४९ पदांची भरती केली जाणार आहे. ही माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली आहे.


आरोग्य विभागातील या भरतीसाठीची जाहिरात मंगळवारीच प्रसिद्ध केली जाणार आहे. २०२१मध्ये आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेवेळेस पेपरफुटीचा प्रकार घडला होता. त्यामुळे ही प्रक्रिया थांबवली गेली होती. त्यामुळे या सरकारवर या भरतीसाठी सरकारवर एकप्रकारचे दबाव होता.


त्यानंतर आता या महायुतीच्या सरकारमध्ये ही भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे जे बेरोजगार तरूण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नक्कीच फायदा होणार आहे.



या पदांसाठी भरती


या भरतीच्या प्रक्रियेत क आणि ड संवर्गातील विविध ६० प्रकारची मिळून एकूण १० हजार ९४९ पदे असणार आहेत. ही प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएसकडून राबवली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली.

Comments
Add Comment

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेवर दि. २५ ते २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर

Mumbai Megablock : मेगा 'ब्लॉक डे' मुंबईकरांना सतावणार! 'लाईफलाईन' लोकलची दुरुस्ती; कोणत्या मार्गांवर सेवा पूर्णपणे बंद राहणार?

मुंबई : मुंबईची लाईफलाइन (Mumbai Lifeline) असलेली उपनगरीय रेल्वे (Suburban Railway) लाखो प्रवाशांना घेऊन अविरत धावत असते. या लोकलच्या

यंदाच्या छठ पुजेत विरोधही होणार मावळ, काय आहे कारण...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी यंदा छठ पुजेच्या निमित्ताने

महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी १९,३१७ नवीन टॅबची खरेदी

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले टॅब आता जुने झाल्याने नव्याने

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा