Asia Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्यात टॉस ठरणार निर्णायक!

नवी दिल्ली : आशिया कप (asia cup) काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यातही भारत-पाकिस्तान सामन्याची सगळेच चाहते अतिशय उत्सुकतेने वाट पाहत आहे. रोहित शर्मा अँड कंपनी २ सप्टेंबरला त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध स्पर्धेतील पहिला सामना खेळणार आहेत.


श्रीलंकेच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी कंबर कसून सज्ज आहेत. कँडीच्या मैदानावर या हाय वोल्टेज सामन्यात टॉस हा महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे. हे आम्ही नव्हे तर पल्लिकल स्टेडियमचे आकडे सांगत आहेत.


आशिया कपआधी एकीकडे टीम इंडिया नेट्समध्ये सराव करत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या संघाने अफगाणिस्तानविरुद्ध जबरदस्त खेळ केला. यावरून दिसते की दोन्ही संघ एकदम तयारीनिशी या स्पर्धेत उतरणार आहेत. दरम्यान, दोन्ही संघादरम्यानच्या खेळामध्ये टॉस महत्त्वाचा ठरणार आहे.


कँडीच्या मैदानावर वनडे फॉरमॅटचा आकडा पाहिला तर पाठलाग कऱणाऱ्या संघाला मोठा फायदा मिळतो. या मैदानावर आतापर्यंत ३३ वनडे सामने खेळवण्यात आले. त्यात आधी पाठलाग करणाऱ्या संघाने १८ सामने जिंकले आहेत.


अनेकदा टॉस जिंकल्यानंतर कर्णधार पहिल्यांदा फलंदाजी करणे पसंत करतात. याच कारणामुळे सुरूवातीला पिच फलंदाजांच्या बाजूने असते. मात्र वेळेसोबतच ही पिच स्पिनर्सला मदत करण्यास सुरूवात करते. यामुळे रोहित शर्मा टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो.

Comments
Add Comment

सेव्हन हिल्स हॉस्पिटलसाठी रिलायन्सने लावली ४५० कोटी रुपयांची बोली

मुंबई : सेव्हन हिल्स हेल्थकेअरच्या मुंबईतील प्रसिद्ध हॉस्पिटल खरेदीसाठी रिलायन्स समूहाशी संबंधित एनके

महिला शिक्षिकांची मासिक पाळीदरम्यान रजेची मागणी

मुंबई : कर्नाटक सरकारने महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळीच्या काळात रजा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर,

१ हजार २९४ नामनिर्देशन पत्रांचे वितरण; ३५ अर्ज दाखल

आतापर्यंत १० हजार ३४३ नामनिर्देशन पत्रांचे वितरण मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शनिवारी २३ निवडणूक

२० जानेवारीपासून नितीन नवीन भाजपचे अध्यक्ष

नवी दिल्ली : नितीन नवीन यांना भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याची घोषणा २० जानेवारी रोजी

आयफोनपासून मॅकपर्यंत ‘या’ Apple उत्पादनांना निरोप

मुंबई : दरवर्षी नवीन तंत्रज्ञान आणि सुधारित मॉडेल्स बाजारात आणताना Apple काही जुनी उत्पादने बंद करत असते आणि यंदा हा

विहिरीतील मोटार काढताना काळाचा घाला; धाराशिवमध्ये बाप-लेकासह चौघांचा दुर्दैवी मृत्यू

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र