Asia Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्यात टॉस ठरणार निर्णायक!

  55

नवी दिल्ली : आशिया कप (asia cup) काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यातही भारत-पाकिस्तान सामन्याची सगळेच चाहते अतिशय उत्सुकतेने वाट पाहत आहे. रोहित शर्मा अँड कंपनी २ सप्टेंबरला त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध स्पर्धेतील पहिला सामना खेळणार आहेत.


श्रीलंकेच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी कंबर कसून सज्ज आहेत. कँडीच्या मैदानावर या हाय वोल्टेज सामन्यात टॉस हा महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे. हे आम्ही नव्हे तर पल्लिकल स्टेडियमचे आकडे सांगत आहेत.


आशिया कपआधी एकीकडे टीम इंडिया नेट्समध्ये सराव करत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या संघाने अफगाणिस्तानविरुद्ध जबरदस्त खेळ केला. यावरून दिसते की दोन्ही संघ एकदम तयारीनिशी या स्पर्धेत उतरणार आहेत. दरम्यान, दोन्ही संघादरम्यानच्या खेळामध्ये टॉस महत्त्वाचा ठरणार आहे.


कँडीच्या मैदानावर वनडे फॉरमॅटचा आकडा पाहिला तर पाठलाग कऱणाऱ्या संघाला मोठा फायदा मिळतो. या मैदानावर आतापर्यंत ३३ वनडे सामने खेळवण्यात आले. त्यात आधी पाठलाग करणाऱ्या संघाने १८ सामने जिंकले आहेत.


अनेकदा टॉस जिंकल्यानंतर कर्णधार पहिल्यांदा फलंदाजी करणे पसंत करतात. याच कारणामुळे सुरूवातीला पिच फलंदाजांच्या बाजूने असते. मात्र वेळेसोबतच ही पिच स्पिनर्सला मदत करण्यास सुरूवात करते. यामुळे रोहित शर्मा टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो.

Comments
Add Comment

Health: दररोज सकाळी खा एक वाटी पपई, महिनाभरात शरीरात दिसतील हे बदल

मुंबई: पपई केवळ एक स्वादिष्ट फळच नाही तर तुमच्या आरोग्यासाठी वरदान आहे. हे शरीरास अनेक प्रकारचे फायदे देते.

क्रिकेट ऑस्ट्रेलिया करणार रोहित-विराटचा सन्मान ?

नवी दिल्ली : रोहित शर्मा आणि विराट कोहलीने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता भारताच्या या दोन

नारी शक्तीच्या कामगिरीने संपूर्ण देशाचा अभिमान वाढवला : पंतप्रधान

नवी दिल्ली: आपल्या माता-भगिनी-कन्यांनी प्रत्येक टप्प्यावर आव्हानांना सामोरं जावं लागणारा काळ पाहिला आहे. पण आज,

Vande Bharat Express: मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस १६ जूनपासून आठवड्यातून तीनच दिवस

रत्नागिरी: भारतीय रेल्वेने मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या (22229/22230) २०२५ च्या मान्सून कालावधीसाठी

विठ्ठल-रुक्मिणीचे २७ जूनपासून मिळणार २४ तास दर्शन

सोलापूर : आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. या आषाढी

पावसाळ्यातील रानभाज्यांचा खजिना; निसर्गाकडून मिळालेला एक आरोग्यदायी वरदान!

मांसाहार नाही, रानभाज्या खा; पावसात मिळते नैसर्गिक औषध आणि पोषण यांचा संगम! पावसाळा सुरू झाला की काहीजण जंगलात