नवी दिल्ली : आशिया कप (asia cup) काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यातही भारत-पाकिस्तान सामन्याची सगळेच चाहते अतिशय उत्सुकतेने वाट पाहत आहे. रोहित शर्मा अँड कंपनी २ सप्टेंबरला त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध स्पर्धेतील पहिला सामना खेळणार आहेत.
श्रीलंकेच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी कंबर कसून सज्ज आहेत. कँडीच्या मैदानावर या हाय वोल्टेज सामन्यात टॉस हा महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे. हे आम्ही नव्हे तर पल्लिकल स्टेडियमचे आकडे सांगत आहेत.
आशिया कपआधी एकीकडे टीम इंडिया नेट्समध्ये सराव करत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या संघाने अफगाणिस्तानविरुद्ध जबरदस्त खेळ केला. यावरून दिसते की दोन्ही संघ एकदम तयारीनिशी या स्पर्धेत उतरणार आहेत. दरम्यान, दोन्ही संघादरम्यानच्या खेळामध्ये टॉस महत्त्वाचा ठरणार आहे.
कँडीच्या मैदानावर वनडे फॉरमॅटचा आकडा पाहिला तर पाठलाग कऱणाऱ्या संघाला मोठा फायदा मिळतो. या मैदानावर आतापर्यंत ३३ वनडे सामने खेळवण्यात आले. त्यात आधी पाठलाग करणाऱ्या संघाने १८ सामने जिंकले आहेत.
अनेकदा टॉस जिंकल्यानंतर कर्णधार पहिल्यांदा फलंदाजी करणे पसंत करतात. याच कारणामुळे सुरूवातीला पिच फलंदाजांच्या बाजूने असते. मात्र वेळेसोबतच ही पिच स्पिनर्सला मदत करण्यास सुरूवात करते. यामुळे रोहित शर्मा टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…