Sangali : आश्रमशाळेतील १७० विद्यार्थ्यांना बासुंदीतून विषबाधा!

डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातील शिल्लक अन्न बाधले


सांगली : सांगलीमधील (Sangali) जत तालुक्यातील उमदी येथील आश्रमशाळेतील १७० विद्यार्थ्यांना बासुंदीतून विषबाधा झाली आहे.


जेवणानंतर या विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळीचा त्रास सुरू झाला होता. विषबाधा झालेल्या मुलांमध्ये पाच ते पंधरा वर्षांपर्यंतच्या वयोगटातील मुलांचा समावेश आहे. त्यानंतर त्यांना तातडीने माडग्याळमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यामुळे सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. परंतु अद्याप देखील ७९ विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.


उमदी येथे विमुक्त आणि भटक्या जमातीतील प्रवर्गातील समता अनुदानित आश्रमशाळा चालवली जाते. जवळपास दोनशेच्या आसपास विद्यार्थी या शाळेमध्ये आहेत. यावेळी या विद्यार्थ्यांना एका डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातील शिल्लक अन्न दिले गेले. त्यामध्ये बासुंदी होती. त्यामुळे आश्रमशाळेतील १७० विद्यार्थ्यांना बासुंदीतून विषबाधा झाली.


दरम्यान, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी या घटनेचे गांभीर्य़ लक्षात घेत तात्काळ या प्रकरणाची दखल घेतली आहे. तसेच संपूर्ण घटनेची चौकशी करून २४ तासाच्या आत अहवाल सादर करण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Online Fraud : शेअर मार्केटमध्ये ‘डबल रिटर्न’चं आमिष; अलिबागमधील व्यक्तीची तब्बल ६६ लाखांची ऑनलाइन फसवणूक

रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीवर मोठा

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीची विक्री बंद

कृषी विभागाचा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार मुंबई : "राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रात उष्णतेचा कहर! IMD चा हाय अलर्ट; ‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’, नागरिकांना इशारा

महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट उसळली असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने अक्षरशः

Devendra Fadnavis : पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “घाबरून खरेदी करू नका, राज्यात...

मुंबई : राज्यात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा पसरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी

Devendra Fadnavis : महाराष्ट्र करणार अणुऊर्जा क्षेत्रात देशाचे नेतृत्व

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा