Mann ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात'चा १०४वा भाग, चांद्रयानच्या मोहिमेवर चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) आज आपल्या मन की बात (mann ki baat) या रेडिओ कार्यक्रमाच्या १०४व्या भागात बोलणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रसारण सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया ट्विटरवरून याची माहिती दिली.सकाळी ११ वाजता ट्यून करा. संपूर्ण भारतातून प्रेरणादायी जीवन प्रवासांना उजाळा देणे ही नेहमीच आनंदाची बाब असते.


मन की बातचा १०३वा भाग ३० जुलैला प्रसारित झाला होता. त्या भागात पंतप्रधान मोदींनी मेरी माटी मेरा देश अभियानाची माहिती दिली होती. मन की बातच्या १०३व्या भागात बोलताना मोदींनी नैसर्गिक आपत्तीबद्दल सांगताना म्हटले की या संकटकाळात भारतातील सर्व देशवासियांनी सामूहिक प्रयत्नांची ताकद दाखवली आहे. स्थानिक लोक, एनडीआरएफचे जवान आणि स्थानिक प्रशासनामध्ये काम करणाऱ्या लोकांनी दिवस-रात्र संघर्ष करून अशा संकटांचा सामना केला आहे.






आजच्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐतिहासिक चांद्र मोहीम चांद्रयान ३च्या चंद्राच्या पृष्ठभागावरील यशस्वी लँडिंगबद्दल बोलणार आहेत. याआधी २३ ऑगस्टला चांद्रयान ३च्या लँडर मॉड्यूलने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे पाऊल ठेवले आहे.


मन की बात कार्यक्रम ३ ऑक्टोबर २०१४मध्ये सुरू झाला आहे ३० एप्रिल २०२३मध्ये या कार्यक्रमाने १०० भाग पूर्ण केले.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात