जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही महायुतीत आलोय - अजित पवार

बीड: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांची आज बीडमध्ये (beed) जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना अजित पवार यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. बीडकरांच्या प्रश्नांना मार्गी लावणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी सभेत बोलताना दिले.शरद पवार यांच्या १७ तारखेला झालेल्या सभेला उत्तर देण्यासाठी ही सभा घेण्यात आली होती. यावेळी सरकारी योजनांबद्दलही त्यांनी जनतेला माहिती दिली.



संतांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलोय


बीडकरांनी आतापर्यंत अनेक चढउतार पाहिले आहेत. तसेच राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो. राजकीय मैत्री जपणारा असा हा बीडचा जिल्हा आहे. समाजकारण आणि राजकारणाची कशी सांगड घालता येते हे बीडकरांनी दाखवून दिलंय. मी येथे संतांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. त्यांनी दाखवलेला समतेचा मार्ग नक्कीच राज्याला दिशा देईल.


 


राज्यात जातीय सलोखा राहायला हवा


प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार येत असतात. मात्र त्यातून पुढे जात राहायचं असतं. मी महायुतीच्या सरकारमध्ये असलो तरी सर्व जाती धर्मांमध्ये आपण एकत्र असल्याची भावना असली पाहिजे. येथेच राहून जनतेच्या कल्याणासाठी काम करायचे आहे. बीडमधील पीक विम्याचा मुद्दा नेहमीच वादग्रस्त ठरतो. आता १ रूपयांत विमा काढता येणार आहे. यासाठी केंद्र तसेच राज्य सरकार पैसे भरणार आहे. केंद्राच्या योजनाही लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत.


आम्ही येथे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहोत. ही पदे केवळ मिरवण्यासाठी नाही. बीडकरांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी नागपूरच्या येत्या काळातील अधिवेशनात सहा लाखांचे बजेट सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात बीडकरांचे प्रश्न मार्गी लावणार आहे.

Comments
Add Comment

Latur : लातूरसाठी ‘देवाभाऊ’ आरोग्यदूत, १०० खाटांच्या नवीन जिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन

लातूर : लातूर जिल्ह्याच्या आरोग्य संवर्धनासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या १०० खाटांच्या अत्याधुनिक जिल्हा

Chitra Wagh : महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना उद्ध्वस्त करणार, चित्रा वाघ कडाडल्या

नाशिक : महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही. तपास पथक आरोपींविरोधात

Fighter Jet Emergency Landing Pune : पुण्यात लढाऊ विमानाचे अचानक लँडिंग; करावे लागले चक्क विमानतळ बंद; नेमकं काय घडलं त्या रात्री?

पुणे : विमानाचा अपघात आता रस्ते अपघातासारखा सर्वसाधारण झालाय. काल पुण्याच्या धावपट्टीवर रात्री एक लढाऊ विमानाचे

Thane : मेट्रो, टनेल, पॉड टॅक्सी ते परवडणारी घरे; ठाणे बनतंय सुपर सिटी

ठाणे : “पूर्वी ‘पुणे तिथे काय उणे’ म्हटले जायचे; आता ‘ठाणे तिथे काय उणे’ असे आत्मविश्वासाने म्हणण्याची वेळ आली

Jitendra Shelke Death : अशोक खरात यांचे निकटवर्तीयाचा ट्रकखाली चिरडून मृत्यू, पत्नी आणि मुलगा गंभीर

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, शुक्रवारी झालेल्या एका भीषण अपघातात

Heat wave : १३ राज्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा, काळजी घेण्याचे आवाहन

- अकोला देशातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक उष्ण शहर मुंबई : सध्या देशभरातील हवामानात मोठे बदल होत आहेत. काही