Mumbai Goa Highway : बरे झाले अडकले, बांधकाम मंत्र्यांना कोकणवासीयांचे हाल तरी कळले!

वाहतूक कोंडीत अडकले सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण... आणि मग...


मुंबई : सध्या राज्यात खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या वेळी चाकरमान्यांना गावी जाताना अनेक अडथळे येण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे १५ हजार कोटींचा खर्च करुनही मुंबई-गोवा महामार्ग (Mumbai Goa highway) अजून पूर्ण झालेला नाही. प्रवाशांचे खूप हाल होत असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavhan) सातत्याने बांधकामाचा आढावा घेत आहेत. पण आज याच कामात असताना त्यांनाच वाहतूक कोंडीचा (Traffic jam) फटका बसला आहे.


मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करताना मंत्री रविंद्र चव्हाण वाहतूक कोंडीत अडकले होते. अखेर ताफा विरुद्ध दिशेने काढत त्यांनी कसाबसा वाहतूक कोंडीतून मार्ग काढला. त्यामुळे इतकी वर्षे कोकणवासीय या खड्ड्यांमधून आणि त्यामुळे होणार्‍या वाहतूक कोंडीतून किती हाल सोसत प्रवास करत असतील याचा अखेर मंत्री महोदयांना आज अंदाज आला असावा अशी प्रतिक्रिया कोकणवासीयांमधून व्यक्त केली जात आहे.


आज सकाळपासूनच मंत्री रविंद्र चव्हाण यांचा पाहणी दौरा सुरु होता. यावेळेस मुंबई-गोवा महामार्गावर पेणच्या दिशेने जाणारी एक बस बंद पडली. त्यामुळे ही वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. परंतु तास-सव्वातास झाल्यानंतरही ही बस या ठिकाणाहून हलवण्यात आली नाही. मागच्या बाजूला वाहनांची गर्दी वाढल्याने बस हलवणे कठीण झाले हाते. त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला उभी करुन एका बाजूने गाड्या पुढे सोडण्यात येत होत्या. या गोष्टीचा प्रवाशांसोबतच मंत्री चव्हाणांना देखील फटका बसला.



चाकरमान्यांच्या वाट्याला सुखकर प्रवास येईल का?


मंत्री रविंद्र चव्हाण बसचे कारण पुढे करत असले तरी मुंबई-गोवा महामार्गावर इतर दिवशीही मोठमोठ्या खड्ड्यांचा व वाहतूक कोंडीचा प्रवाशांना सामना करावा लागतो. या गोष्टीकडे लक्ष देण्याऐवजी निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने महामार्गावरून सध्या राजकारण सुरू आहे. भाजपचे कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मात्र जुलै २०१९ मध्येच या गोष्टीची दखल घेतली. चौपदरीकरणाचे रखडलेले काम पूर्ण होत नसल्याने २०१९ मध्ये नितेश राणे यांनी संबंधित अभियंत्याला चिखलाने आंघोळ घातली होती. त्यांनी केलेल्या अनोख्या आंदोलनाचे महत्त्व कोकणवासीयांना आता कळले आहे. परंतु मंत्री महोदयांना आता फटका बसल्यावर याची जाणीव होईल का आणि गणेशोत्सवाआधी चाकरमान्यांच्या वाट्याला सुखकर प्रवास येईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



हेही वाचा : 



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील

मुंबईत महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून केले अभिनंदन

राज्यभरातील २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीच अव्वल मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरलेल्या मुंबई

Raj Thackeray : भावाशी युती करूनही राज ठाकरेंच्या खात्यात २२ शून्य, मुंबईत 'मनसे'ला जबरदस्त धक्का; ठाकरे ब्रँड फेल!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी २० वर्षांचा वनवास संपवून एकत्र आलेल्या 'ठाकरे बंधूं'साठी आजचा निकाल