Mumbai Metro : ‘मेट्रो २ अ’च्या स्थानकांचे पुन्हा ऑडिट होणार!

  140

मुंबई : मेट्रो '२ अ' आणि '७' ही मेट्रोसेवा (Mumbai Metro) सुरू झाल्यापासून वर्षभराच्या आतच या स्थानकांच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बुधवारी मंडपेश्वर मेट्रो स्थानकाबाहेरील काचेचे पॅनल कोसळून एका रिक्षाचे नुकसान झाले. त्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सर्व मेट्रो स्थानकांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.


मेट्रो '२ अ' च्या एकूण १७ स्थानकांपैकी ३ स्थानकांवर दर्शनी भागात असलेल्या काचेच्या फलकांचा वापर करण्यात आला आहे. या दुर्घटनेनंतर ज्या स्थानकाच्या दर्शनी भागात काचेचे पॅनल वापरण्यात आले आहेत, त्या ३ स्थानकांचे ऑडिट करण्यात येणार आहे. १० दिवसांच्या आत ऑडिट पूर्ण होण्याची शक्यता आहे. आढावा घेऊन इतर ठिकाणी कार्यवाही केली जाईल.


दरम्यान, आयसी कॉलनी मेट्रो स्थानकाच्या दर्शनी भागातील काचेचे पॅनल काढून टाकण्यात येत आहेत. हा सर्व खर्च कंत्राटदारामार्फत करण्यात येत आहे, अशी माहिती एमएमआरडीएने दिली.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र