Jitendra Awhad vs Hasan Mushrif : 'मी नाय त्यातली.. म्हणणा-या आव्हाडांना लोकच कोल्हापुरी पायताणाने हाणतील'

जितेंद्र आव्हाडांच्या कोल्हापुरी चप्पलेवर हसन मुश्रीफांचे चोख प्रत्युत्तर!


कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार यांच्या गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कोल्हापूरमधील सभेत अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर (Jitendra Awhad vs Hasan Mushrif) जोरदार टीका केली होती. त्यावर 'मी नाय त्यातली.. म्हणणा-या जितेंद्र आव्हाड यांच्या लपवलेल्या गोष्टी उघडकीस आल्यावर लोकच त्यांना असली कोल्हापुरी पायताणाने हाणतील,' अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली.


जितेंद्र आव्हाड यांनी कोल्हापूर सभेत अजित पवार गटाच्या नेत्यांवर जोरदार टीका केली होती. आव्हाड यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांना थेट गद्दार म्हटलं होतं. गद्दारी काही लोकांच्या रक्तातच असते, ते आता महाराष्ट्राला दिसत आहे. जे साप बिळात होते, ते बाहेर पडले आहेत. या सापांना चेचण्यासाठी आपल्याला पायतानाचा वापर करावा लागेल. कोल्हापुरात पायताण प्रसिद्घ आहे. त्याचा उपयोग महाराष्ट्राने करावा, असा टोला आव्हाडांनी लगावला होता.


त्यावर हसन मुश्रीफ म्हणाले की, जितेंद्र आव्हाड मला फार ज्युनियर आहेत. त्यांनी पवार साहेबांवर काय जादू केली, मला माहित नाही. पण त्यांनी ठाण्यात पक्ष संपविण्याचं काम केलं आहे. त्यांनी अजित पवार आणि आमच्याविषयी असं बोलायला नको. ज्यावेळी आम्ही सत्तेत जाण्यासाठी शरद पवारांना पत्र दिलं होतं. त्यात ५३ स्वाक्षऱ्या होत्या. त्यात जितेंद्र आव्हाड यांचीही स्वाक्षरी होती. तेव्हा कुठं गेला होता तुझा धर्म असा सवाल करत मुश्रीफ म्हणाले, कोल्हापुरात चप्पल प्रसिद्ध नाही, कापशीची चप्पल प्रसिद्ध आहे. ती बसली की कळेल त्यांना, असे मुश्रीफ म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Maharashtra Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर! १७ NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; लोणावळ्यात तब्बल ६७० मिमी पावसाची नोंद

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात

इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत वारकऱ्यांची गैरसोय; मुंबई डबेवाले करणार भोजन व निवासाची व्यवस्था

Mumbai  : खेड, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे

Heavy Rain in Mumbai Pune : पावसाचा कहर! मुंबई-ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्यात १२ जुलैपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी उद्या

Flood in Indrayani : इंद्रायणीला पूर; वारकऱ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आवाहन! आळंदीत न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीकडे निघालेल्या वारकरी आणि भाविकांसाठी राज्य

TET Exam Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! चारही आरोपींना १८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

भिवंडी : राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात मोठी घडामोड झाली