Green hydrogen : ग्रीन हायड्रोजनच भविष्यातील इंधन - केंद्रीय मंत्री हरदीप पुरी

  107

नवी दिल्ली : भारतात इंधनाचा वापर जगातील इतर देशांच्या तुलनेत तिप्पट आहे. आज तुम्हाला इंधनाच्या वापरातून अर्थव्यवस्थेच्या विकासाची कल्पना येऊ शकते. ग्रीन हायड्रोजन (Green hydrogen) हे भविष्यातील इंधन आहे, असे केंद्रीय मंत्री हरदीप पुरी (Hardeep Puri) म्हणाले.


एनडीटीव्ही कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना केंद्रीय मंत्री हरदीप पुरी म्हणाले की, "आज तुम्हाला इंधनाच्या वापरातून अर्थव्यवस्थेच्या विकासाची कल्पना येऊ शकते. ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन आहे. आज नाही तर उद्या ग्रीन फ्युएल फॉसिल फ्युएलच्या किमतीत मिळेल. आणि हे लवकरच होईल."


"भविष्यात भारत १० ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनू शकतो"


केंद्रीय मंत्री पुढे बोलताना म्हणाले की, भारतानं दहाव्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेपासून पाचव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचा प्रवास केला आहे. भविष्यात भारत १० ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनू शकेल याबद्दल कोणालाही शंका नाही. तसेच, पुरी यांनी बोलताना मॉर्गन स्टॅन्ले यांच्या वक्तव्याचा देखील दाखला दिला. ते म्हणाले की, मॉर्गन स्टॅन्ले यांचं म्हणणं आहे की, भारताचं भविष्य हे चीनच्या भूतकाळासारखं असेल.


ते म्हणाले की, "२०२१ मध्ये लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रीन हायड्रोजनचा अवलंब करण्याबाबत सांगितलं तेव्हा अनेकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले. लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात ज्यावेळी पंतप्रधान असं मोठं वक्तव्य करतात, त्यावेळी नक्कीच काहीतरी अर्थ असतो.

Comments
Add Comment

नारी शक्तीच्या कामगिरीने संपूर्ण देशाचा अभिमान वाढवला : पंतप्रधान

नवी दिल्ली: आपल्या माता-भगिनी-कन्यांनी प्रत्येक टप्प्यावर आव्हानांना सामोरं जावं लागणारा काळ पाहिला आहे. पण आज,

आसाममध्ये ३.३७ लाख नागरिकांना पुराचा तडाखा, २३ मृत्यू

दिसपूर : आसामच्या १२ जिल्ह्यांमध्ये पुराता तडाखा बसला आहे. याठिकाणचे सुमारे ३.३७ लाख नागरिक अजूनही पुराच्या

Corona Updates: देशभरात कोरोनाचे ६,१३३ रुग्ण, २४ तासांत ६ जणांचा मृत्यू!

नवी दिल्ली: देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ (Corona Cases In India) लागली आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे

जागतिक महासागर दिवस २०२५: भारतातील ५ सर्वात स्वच्छ किनारे कोणते आहेत जे तुम्ही एक्सप्लोर केले पाहिजेत?

देश-विदेशातील लोक भारताची संस्कृती, खाद्यपदार्थ आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी येतात. आता जर तुम्ही कुठेतरी

दंगल सुरू झाल्यामुळे मणिपूरच्या पाच जिल्ह्यांत पाच दिवस इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क बंद

इंफाळ : राष्ट्रीय तपास संस्थेने अर्थात एनआयएने मैतेई ग्रुप आरंबाई टेंगोलच्या पाच जणांना अटक केली आहे. यातील एक

एलॉन मस्क यांच्यावरून ट्रम्प - पुतिन यांच्यात जुंपणार?

रशियाने देऊ केला राजकीय आश्रय वॉशिग्टन: टेस्ला कंपनीचे सीईओ आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प