Devendra Fadnavis Japan Visit : मी तिकडे काही फिरायला गेलो नव्हतो

नाना पटोलेंच्या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांचे जोरदार प्रत्युत्तर


कसा होता फडणवीसांचा जपानचा अनुभव?


मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा जपानमध्ये शासकीय अतिथी म्हणून सन्मान करण्यात आला. आजच ते आपल्या या दौऱ्यावरुन परतले आहेत. परतल्यानंतर मुंबई विमानतळावरच त्यांना पत्रकारांनी घेरलं. यावेळेस अनेक मुद्द्यांवर ते व्यक्त झाले. भारत- जपान संबंधांविषयी बोलताना त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जोरदार टीकास्र देखील सोडलं.


देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला अतिशय आनंद आहे की, जपानचा दौरा करून पुन्हा एकदा मातृभूमीचं दर्शन घेता आलं. मुंबईमध्ये आल्यानंतर मला अतिशय प्रसन्न वाटतंय. खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ सालापासून जपानसोबत जे संबंध उत्कृष्ट केले आणि तेव्हाचे पंतप्रधान शिंजो आबेसान आणि आताचे पंतप्रधान यांच्यासोबत त्यांनी ज्या प्रकारचे संबंध प्रस्थापित केले त्यामुळे आज जपान आणि भारत खूप जवळ आले आहेत.


पंतप्रधान मोदींवर काँग्रेसने केलेल्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, काँग्रेस काय बोलतोय यावर मला काही बोलायचं नाही. कारण काँग्रेस ही एक फ्रस्ट्रेटेड पार्टी आहे. काँग्रेसने देशाबद्दल विचार करणे बंद केले आहे. आज पूर्ण देशाला हे माहित आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये आपण प्रगती करत आहोत. त्या दिवशी पण चांद्रयान लँड करत होते तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः दक्षिण आफ्रिकेमध्ये बसून मिनिट टू मिनिट याची माहिती घेत होते. आपल्या वैज्ञानिकांनी चांगलं काम केलं आहे तर त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रधानमंत्री जाणार नाहीत तर कोण जाणार? त्यामुळे मला असं वाटतं की एवढ्या खालच्या स्तरावर राजकारण करण्यावरती विरोधी पक्ष उतरला आहे, असं फडणवीस म्हणाले.


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या टीकेवर बोलताना फडणवीस म्हणाले, नाना पटोलेंना कधीच मी गांभीर्याने घेतलेले नाही. नाना पटोले सकाळी एक बोलतात दुपारी एक बोलतात आणि संध्याकाळी एक बोलतात. मी जपानला गेलो भारताकरिता काहीतरी घेऊन आलो. मुंबईकरता काहीतरी घेऊन आलो. मी तिकडे काही फिरायला गेलो नव्हतो. नाना पटोले महाराष्ट्राभर कशाकरता फिरतात आणि काय करतात हे मला माहित आहे. ते माझे मित्र आहेत ते काय बोलले असतील तर मी त्यांना माफ करतो.



कसा होता फडणवीसांचा जपानचा अनुभव?


फडणवीस म्हणाले की, जपान मधल्या मराठी लोकांनी मराठमोळं स्वागत केलं हा माझ्याकरता एक खूप चांगला अनुभव होता. त्यासोबत भारतीय दुतावासामध्ये चांद्रयान मोहिमेच्या संदर्भात लँडिंग करिता सर्व लोक जमा होते, त्यावेळी त्यांच्यासोबत लँडिंग पाहाणं ही एक पर्वणी होती. त्यांच्यातला उत्साह, त्यांच्यातली देशभक्ती इतकी प्रचंड होती, की आमच्यासमोर त्यांनी जपानमध्ये भारत जीवंत केला. त्यामुळे त्या सगळ्या जपान मधील भारतीयांचे मी अभिनंदन करतो.


मला मानद डॉक्टर पदवी त्या ठिकाणी दिली आहे, याचा मला आनंद आहे. त्यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो. हा काही माझा सन्मान नाही, हा महाराष्ट्राचा सन्मान आहे. कारण मी महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून तिकडे गेलो होतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील