विरार : सकाळ – संध्याकाळ गर्दीच्या वेळेला पालघर, बोईसर, डहाणू येथे जाणाऱ्या विरार भागातील गरजू नागरिकांची व चाकरमान्यांची रोज वेळेवर गाड्या नसल्याने रखडपट्टी होत आहे. तर काही बांधकाम व्यावसायिक, वकील यांना ट्रेनचा प्रवास टाळून स्वत:च्या खासगी वाहनांनी मुंबई – अहमदाबाद महामार्गावरून लांबचा वळसा घालून पेट्रोल व जादा खर्च करून यावे-जावे लागत आहे.
लोकल ट्रेनला कमालीची गर्दी असते. जाण्यासाठी सकाळी व संध्याकाळी कमीत कमी एक तासाहून अधिक वेळ ट्रेनसाठी थांबावे लागते. गाडीत सामान्य कष्टकरी व मुंबईवरून येणाऱ्या चाकरमान्यांची आधीच गर्दी असते. इतर अधून-मधून जाणाऱ्या प्रवाशांना गाडीत चढणे देखील मुश्किल होते. गाडीचे टाईमटेबल फिक्स नाही. मुख्य म्हणजे रोज कामधंद्याची धावपळ असणाऱ्या नागरिकांना लोकल मेमू व एक्स्प्रेस गाड्यांनी सकाळ – संध्याकाळ गर्दीच्या वेळी प्रवास करावा लागतो. अशावेळी लोकल ट्रेनचे तिकीट एक्स्प्रेस गाडीला चालत नाही. एक्स्प्रेसचे तिकीट वेगळे काढावे लागते.
खासगी वाहनाने बोईसर, पालघर येथून वसई – विरारला येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना खड्डे पडलेले रस्ते व मुंबई – अहमदाबाद महामार्ग असलेल्या नादुरुस्त रस्त्याचा खूप त्रास सहन करावा लागतो. आता रस्ते बिघडल्याने अनियमित लोकल ट्रेन व एक्स्प्रेस गाड्यांची सेवा रेल्वेने अधिक देऊन स्थानिक प्रवाशांना न्याय द्यावा, अशी मागणी प्रवासी व नागरिकांमधून केली जात आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…