विरार-डहाणू रेल्वे गाड्या वाढविण्याची मागणी

गर्दीच्या वेळेला प्रवाशांची रखडपट्टी


विरार : सकाळ - संध्याकाळ गर्दीच्या वेळेला पालघर, बोईसर, डहाणू येथे जाणाऱ्या विरार भागातील गरजू नागरिकांची व चाकरमान्यांची रोज वेळेवर गाड्या नसल्याने रखडपट्टी होत आहे. तर काही बांधकाम व्यावसायिक, वकील यांना ट्रेनचा प्रवास टाळून स्वत:च्या खासगी वाहनांनी मुंबई - अहमदाबाद महामार्गावरून लांबचा वळसा घालून पेट्रोल व जादा खर्च करून यावे-जावे लागत आहे.


लोकल ट्रेनला कमालीची गर्दी असते. जाण्यासाठी सकाळी व संध्याकाळी कमीत कमी एक तासाहून अधिक वेळ ट्रेनसाठी थांबावे लागते. गाडीत सामान्य कष्टकरी व मुंबईवरून येणाऱ्या चाकरमान्यांची आधीच गर्दी असते. इतर अधून-मधून जाणाऱ्या प्रवाशांना गाडीत चढणे देखील मुश्किल होते. गाडीचे टाईमटेबल फिक्स नाही. मुख्य म्हणजे रोज कामधंद्याची धावपळ असणाऱ्या नागरिकांना लोकल मेमू व एक्स्प्रेस गाड्यांनी सकाळ - संध्याकाळ गर्दीच्या वेळी प्रवास करावा लागतो. अशावेळी लोकल ट्रेनचे तिकीट एक्स्प्रेस गाडीला चालत नाही. एक्स्प्रेसचे तिकीट वेगळे काढावे लागते.


खासगी वाहनाने बोईसर, पालघर येथून वसई - विरारला येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना खड्डे पडलेले रस्ते व मुंबई - अहमदाबाद महामार्ग असलेल्या नादुरुस्त रस्त्याचा खूप त्रास सहन करावा लागतो. आता रस्ते बिघडल्याने अनियमित लोकल ट्रेन व एक्स्प्रेस गाड्यांची सेवा रेल्वेने अधिक देऊन स्थानिक प्रवाशांना न्याय द्यावा, अशी मागणी प्रवासी व नागरिकांमधून केली जात आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

उष्ण पदार्थांचे अति सेवन : उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या समस्यांचे प्रमुख कारण !

मुंबई : आयुर्वेद हा भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनावर विशेष

नरिमन पॉइंट ते वसईपर्यंत १० मार्गांवर होणार जलवाहतूक

मुंबई : महामुंबईत १० मार्गांवर जलवाहतूक सुरू होणार आहे. याद्वारे नव्या विमानतळाला चार मार्ग जोडले जाणार आहेत.

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा