चाकरमान्यांनो, आता विमानाने जा गावाला, मुंबई-सिंधुदुर्ग नियमित सेवा होणार सुरू

मुंबई: गणपती(ganpati) म्हटला की कोकणी माणसाला गावाला जाण्याची ओढ लागते. कोकणातील (kokan) गणपतीची मजा ही काही न्यारीच असते. मात्र गणपतीला कोकणात जाण्यासाठीचा जो प्रवास असतो तो काही सोपा नसतो. गणपतीसाठी बुकिंग करणे म्हणजे ही कसोटीच असते.


गणपतीसाठी रेल्वे, बसचे बुकिंग आधीच हाऊसफुल्ल झाल्याने अनेकांचा हिरमोड झालाय. तुम्हालाही बस किंवा रेल्वेचे तिकीट मिळालेले नाही आहे का तर मग टेन्शन कशाला घेता. आता चिपी विमानतळावरून मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमानसेवा नियमितपणे येत्याfliहे. ते सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी बोलताना त्यांनी माहिती दिली.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून मुंबई ते सिंधुदुर्ग तसेच सिंधुदुर्ग ते मुंबई असा विमान प्रवास सुरू करण्यात आला होता. मात्र ही सेवा नियमित नव्हती. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या लोकांचा हिरमोड झाला होता. लोकांचा हाच मुद्दा लक्षात घेता पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना भेटले होते. यावेळी त्यांनी या प्रश्नाबद्दल चर्चा केली. तसेच या अडचणीची संपूर्ण माहितीही दिली.


गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही सेवा सुरळीत करण्यात यावी अशी मागणी रवींद्र चव्हाण यांनी केली होती. १९ सप्टेंबरला गणेशोत्सव आहे. त्यांच्या या मागणीनुसार ही विमानसेवा येत्या १ सप्टेंबरपासून नियमित होणार असल्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले आहे.


इतकंच नव्हे तर रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही याबाबत चर्चा केली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशीही याबाबत चर्चा केली होती.

Comments
Add Comment

BMC APP : रस्त्यांवर खड्डे दिवसात का? करा माय बीएमसी मार्ग ऍपवर तक्रार

Mumbai : नागरिकांच्या तक्रारींचे जलद व प्रभावी निवारण करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने या वर्षी ‘MyBMC MARG’

BMC : घरकाम करणाऱ्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी पालिकेचे 'अ‍ॅप' विकसित करा; महिला व बाल कल्याण समिती अध्यक्षांची मागणी

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या महिला बचत गटातील सदस्यांना हक्काचा रोजगार

Industrial and commercial water usage : तरण तलाव, बांधकामांच्या ठिकाणच्या जलजोडण्या करणार खंडित

औद्योगिक व व्यावसायिक पाणी वापरात २० टक्के कपात मुंबई: पावसाळा लांबणीवर पडल्याने मुंबईत १५ मे २०२६ पासून १०

Commissioner Dr. Ashwini Joshi : अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची बदली

प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची नियुक्ती मुंबई  : मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची

Water Shortage : पाणीटंचाईचे सावट गडद

जलतरण तलाव व बांधकामांच्या जलजोडण्या खंडित ; उद्योगांना २० टक्के कपात मुंबई : नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन

Alternative Transport Hub : बोरिवली स्थानकावरील गर्दी कमी होणार; कांदिवलीचा 'पर्यायी वाहतूक केंद्र' म्हणून विकास

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील सर्वात वर्दळीचे स्थानक असलेल्या बोरिवली स्थानकावरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी