चाकरमान्यांनो, आता विमानाने जा गावाला, मुंबई-सिंधुदुर्ग नियमित सेवा होणार सुरू

मुंबई: गणपती(ganpati) म्हटला की कोकणी माणसाला गावाला जाण्याची ओढ लागते. कोकणातील (kokan) गणपतीची मजा ही काही न्यारीच असते. मात्र गणपतीला कोकणात जाण्यासाठीचा जो प्रवास असतो तो काही सोपा नसतो. गणपतीसाठी बुकिंग करणे म्हणजे ही कसोटीच असते.


गणपतीसाठी रेल्वे, बसचे बुकिंग आधीच हाऊसफुल्ल झाल्याने अनेकांचा हिरमोड झालाय. तुम्हालाही बस किंवा रेल्वेचे तिकीट मिळालेले नाही आहे का तर मग टेन्शन कशाला घेता. आता चिपी विमानतळावरून मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमानसेवा नियमितपणे येत्याfliहे. ते सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी बोलताना त्यांनी माहिती दिली.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून मुंबई ते सिंधुदुर्ग तसेच सिंधुदुर्ग ते मुंबई असा विमान प्रवास सुरू करण्यात आला होता. मात्र ही सेवा नियमित नव्हती. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या लोकांचा हिरमोड झाला होता. लोकांचा हाच मुद्दा लक्षात घेता पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना भेटले होते. यावेळी त्यांनी या प्रश्नाबद्दल चर्चा केली. तसेच या अडचणीची संपूर्ण माहितीही दिली.


गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही सेवा सुरळीत करण्यात यावी अशी मागणी रवींद्र चव्हाण यांनी केली होती. १९ सप्टेंबरला गणेशोत्सव आहे. त्यांच्या या मागणीनुसार ही विमानसेवा येत्या १ सप्टेंबरपासून नियमित होणार असल्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले आहे.


इतकंच नव्हे तर रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही याबाबत चर्चा केली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशीही याबाबत चर्चा केली होती.

Comments
Add Comment

Mhada : म्हाडाच्या घरांसाठी शुक्रवारपर्यंत अर्ज करता येणार

आतापर्यंत ८७ हजार २३९ अर्ज, तर ६१,१५३ अनामत रक्कमेसह अर्ज दाखल मुंबई : म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करण्याची

Water Management : तलावांमध्ये १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

पाणी जपून वापरण्याचे मुंबईकरांना आवाहन मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये फक्त २,५८,४१० द. श. लि.

Nashik :नाशिकच्या TCS मध्ये कॉर्पोरेट जिहाद तर मुंबईत बँक जिहाद ? नरिमन पॉइंटच्या शाखेतील धक्कादायक घटना

मुंबई : नाशिकच्या TCS मधील कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण उजेडात आले, पोलिसांनी गुन्हे नोंदवले आणि कायदेशीर कारवाई सुरू

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध – मंत्री नितेश राणे

मुंबई  : महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना

Marathi :मराठीचे धिंडवडे काढणारा 'तो' फलक अखेर हटवला

 'प्रहार'च्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग मुंबई : मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर मराठी भाषेची आणि व्याकरणाची

Mumbai Crime : हायप्रोफाइल टॉवरमध्ये सुरू होता ड्रग्जचा काळाबाजार; उग्र वासामुळे पोलिसांनी टाकला छापा, मैत्रिणीसह तिघे ताब्यात...

Crime News : दक्षिण मुंबईतील आग्रीपाडा परिसरातील हायप्रोफाइल यास्मीन टॉवरमध्ये सुरू असलेला ड्रग्जचा मोठा रॅकेट मुंबई