Food poisoning in Bhandara : भंडार्‍यातील आश्रमशाळेत ४१ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

४ जणांची प्रकृती गंभीर


भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील एका आदिवासी आश्रमशाळेतील (Ashram School) ४१ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा (Food poisoning) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुमसर तालुक्यातील येरली येथील शाळेत हा प्रकार घडला असल्याची माहिती मिळाली आहे. या विद्यार्थ्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील ४ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजत आहे.


उलटी, मळमळ, पोटदुखीचा त्रास सुरु झाल्यानंतर रात्री उशिरा ३६ विद्यार्थ्यांना तुमसर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आलं. त्यानंतर आणखी पाच जणांची प्रकृती बिघडली. त्यामुळे आता उपचार घेणार्‍या विद्यार्थ्यांचा आकडा ४१ वर पोहोचला आहे. यातील चार विद्यार्थ्यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. सध्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात २३ तर तुमसर उपजिल्हा सामान्य रुग्णालयात १८ विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत.


भंडारा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका विद्यार्थिनीने यासंबंधी सविस्तर माहिती दिली. तिने सांगितल्यानुसार, काल वर्गात गेल्यावर मुलांनी वाटाणा, चणा आणि बटाट्याची भाजी खाल्ली. त्यानंतर काही जणांना पोटदुखीचा त्रास सुरु झाला व त्यांनी शिक्षकांना याबद्दल माहिती दिली. त्यामुळे मुलांना ताबडतोब रुग्णालयात आणून उपचार सुरु करण्यात आले.


दरम्यान, रुग्णालयाच्या बालरोग तज्ज्ञ डॉ. सुचिता वाघमारे यांनी मुलांना योग्य ते उपचार देण्यात येत आहेत, तसेच ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना इमर्जन्सी सुविधा पुरवल्या जात आहेत, अशी माहिती दिली.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार! रविवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरींचा अंदाज; २५ जिल्ह्यांना येलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात रविवारचा दिवस पावसाळी ठरण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील २५

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली