Teacher recruitment : डी. एड. बेरोजगारांना न्याय मिळवून देणार!

शिक्षक भरतीसंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा शब्द


कणकवली : यंदा होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये (Teacher recruitment) स्थानिक डी. एड. बेरोजगारांना २०१० प्रमाणे पुन्हा डावलण्यात येईल अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे सद्यस्थितीत होणारी भरती ही पवित्र पोर्टलमार्फत राज्यस्तरीय भरती प्रक्रिया असणार आहे. गेली १० वर्षे भरती न झाल्यामुळे येत्या शिक्षक भरतीत जिल्ह्यातील उमेदवारांना संधी न मिळाल्यास त्यांची वयोमर्यादा संपणार आहे. त्यामुळे पोर्टलमधूनच पूर्वीचे कोकण निवड मंडळ स्थापन करून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक डी. एड. बेरोजगारांना न्याय द्यावा, अशी मागणी डी. एड. बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची भेट घेऊन करण्यात आली.


स्थानिक डी. एड. बेरोजगारांनी २७ मार्चपासून केलेल्या १४ दिवसांच्या उपोषणाला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भेट देऊन न्याय मिळवून देणार, म्हणून आश्वासित केले होते. जूनपासून शाळा सूरू होऊन पाच महिने झाले, तरी काही शाळांना शिक्षक मिळाले नाही. स्थानिकांना त्या शाळेत शिक्षक म्हणून संधी द्यावी, यासाठी प्रयत्न झाले; पण स्थानिकांवर प्रशासनाने पूर्ण दुर्लक्ष केले. त्यावर लक्ष वेधण्यासाठी व मागील आश्वासनाचा पाठपुरावा करण्यासाठी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री नारायण राणे यांची कणकवली येथे नुकतीच भेट घेतली.


जिल्ह्यातील डी. एड. बेरोजगारांचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. याबाबत येत्या आठ दिवसांत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व सचिवांची मंत्रालय पातळीवर एकत्रित बैठक घेऊन तोडगा काढू, असा शब्द मंत्री नारायण राणे यांनी दिला. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, दोडामार्ग माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, भाजप दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, अजय परब, समीर ठाकूर आदी उपस्थित होते.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Parth Pawar : विरोध असलेल्या VSR कंपनीच्या विमानातून पार्थ पवार यांनी केला प्रवास

मुंबई : राष्ट्रीवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हळहळाला.

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह

Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या