Asia Cup 2023:आशिया चषकात रोहित, विराट करणार विक्रमी कामगिरी?

जयसूर्याचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची संधी


आशिया चषकाच्या(Asia Cup 2023) इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याच्या नावे आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली हे या विक्रमाच्या जवळ असून आगामी आशिया चषक स्पर्धेत हा विक्रम मोडण्याची त्यांना संधी आहे.


आशिया चषकाच्या इतिहासात सनथ जयसूर्याने १२२० धावा केल्या असून या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. या सर्व धावा फक्त आशिया कपमधील एकदिवसीय सामन्यात केल्या आहेत. भारताच्या विराट कोहलीने या स्पर्धेत १०४२ धावा जमवल्या आहेत. रोहित शर्माने स्पर्धेच्या इतिहासात १०१६ धावांचे योगदान दिले आहे. जयसूर्या आणि कोहली, रोहितच्या धावांमधील अंतर फारसे नाही. त्यामुळे आगामी आशिया चषक स्पर्धेत या दोन्ही खेळाडूंना जयसूर्याचा विक्रम मोडण्याची संधी आहे.


रोहित शर्माने एकदिवसीय आशिया कपमध्ये २२ सामन्यांच्या २१ डावांमध्ये ७४५ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतक आणि ६ अर्धशतके आहेत. दुसरीकडे, विराट कोहलीने आतापर्यंत एकदिवसीय आशिया कपमध्ये ११ सामन्यांच्या १० डावात ६१३ धावा केल्या आहेत. टी-२० आशिया कपमध्ये कोहलीने १० सामन्यांच्या ९ डावांत ४२९ धावा केल्या आहेत. टी-२० आशिया कपमध्ये रोहितने ९ सामन्यांच्या ९ डावांत २७१ धावा केल्या आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात

भारत वि ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 सामना मेलबर्नमध्ये रंगणार

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे खेळवला

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल