Asia Cup 2023:आशिया चषकात रोहित, विराट करणार विक्रमी कामगिरी?

  136

जयसूर्याचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची संधी


आशिया चषकाच्या(Asia Cup 2023) इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याच्या नावे आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली हे या विक्रमाच्या जवळ असून आगामी आशिया चषक स्पर्धेत हा विक्रम मोडण्याची त्यांना संधी आहे.


आशिया चषकाच्या इतिहासात सनथ जयसूर्याने १२२० धावा केल्या असून या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. या सर्व धावा फक्त आशिया कपमधील एकदिवसीय सामन्यात केल्या आहेत. भारताच्या विराट कोहलीने या स्पर्धेत १०४२ धावा जमवल्या आहेत. रोहित शर्माने स्पर्धेच्या इतिहासात १०१६ धावांचे योगदान दिले आहे. जयसूर्या आणि कोहली, रोहितच्या धावांमधील अंतर फारसे नाही. त्यामुळे आगामी आशिया चषक स्पर्धेत या दोन्ही खेळाडूंना जयसूर्याचा विक्रम मोडण्याची संधी आहे.


रोहित शर्माने एकदिवसीय आशिया कपमध्ये २२ सामन्यांच्या २१ डावांमध्ये ७४५ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतक आणि ६ अर्धशतके आहेत. दुसरीकडे, विराट कोहलीने आतापर्यंत एकदिवसीय आशिया कपमध्ये ११ सामन्यांच्या १० डावात ६१३ धावा केल्या आहेत. टी-२० आशिया कपमध्ये कोहलीने १० सामन्यांच्या ९ डावांत ४२९ धावा केल्या आहेत. टी-२० आशिया कपमध्ये रोहितने ९ सामन्यांच्या ९ डावांत २७१ धावा केल्या आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार