Gashmeer Mahajani : 'मी माझ्या वडिलांना एका छोट्या घरात सोडले...' अखेर गश्मीरने केला सगळ्या गोष्टींचा खुलासा!

आपल्या शेवटच्या क्षणांत का एकटे होते रविंद्र महाजनी?


मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील विनोद खन्ना अशी ओळख असणारे ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचं साधारण महिनाभरापूर्वी अत्यंत दुर्दैवी पद्धतीने निधन झालं. त्यांच्या राहत्या खोलीत त्यांचा मृतदेह निधनानंतर तीन दिवसांनी सापडला, परंतु तोपर्यंत कोणालाच याची खबर नव्हती. या निधनाने सर्वांनाच धक्का बसला असला तरी या गोष्टीमुळे त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) याला अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागलं. वडिलांचं अशा पद्धतीने निधन होणं आणि गश्मीरचं त्या ठिकाणी नसणं याबद्दल त्याला दोष देण्यात आला. यावर गश्मीरने लगेच काही प्रतिक्रिया देणे टाळले होते. आता मात्र त्याने याबाबत खुलासा केला आहे.


वडील रविंद्र महाजनी वेगळे का राहायचे याविषयी गश्मीर म्हणाला, "मी माझ्या वडिलांना एका छोट्या घरात सोडले आणि मी लक्झरी आयुष्य जगत आहे, असं अनेकांना वाटत होतं पण तसं नव्हतं. त्यांनी स्वतःच २० वर्षांपूर्वी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. एक कुटुंब म्हणून आम्ही काहीही करू शकलो नाही. आम्ही त्यांचं वेगळं होणं स्वीकारलं कारण कोणावरही कुणासोबत राहण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही. त्यांना पाहिजे तेव्हा ते आमच्याकडे राहायला यायचे, आणि त्यांची इच्छा झाली की निघून जायचे.


पुढे गश्मीर म्हणाला, माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा ते बराच काळ आमच्यासोबत राहिले होते. ते मूडी होते अन् स्वतःची कामे स्वत: करत असत. या कारणास्तव, जेव्हा आम्ही त्यांच्यासाठी केअर टेकरची नियुक्ती करायचो तेव्हा ते एक-दोन दिवसांत त्याला कामावरुन काढून टाकत असत.



आम्हाला त्यांच्या मृत्यूबद्दल उशीरा कळलं कारण...


गश्मीर पुढे म्हणतो, गेल्या तीन वर्षांत बाबांनी स्वतःला सगळ्यांपासून, अगदी त्यांच्या कुटुंबापासूनही दूर केलं. शेजाऱ्यांशी बोलणं किंवा मित्रांसोबत मॉर्निंग वॉक करणं सुद्धा त्यांनी बंद केलं. आम्हाला त्यांच्या मृत्यूची माहिती उशिरा कळण्याचे हे देखील एक मोठे कारण होते. मला यापेक्षा अधिक काही स्पष्ट करायचे नाही, कारण मी जे काही बोललो त्याचा गैरसमज होईल. पण आता मी समाधानी आहे.



...मला 'एवढेच' लक्षात ठेवायचे आहे


वडिलांसोबतच्या नात्याबद्दल बोलताना गश्मीर म्हणाला, 'आमच्या कुटुंबात अनेक कारणं होती, ज्यामुळे नातं खराब होतं. पण ते माझ्या आईचे पती आणि माझे वडील होते. अनेक वैयक्तिक सखोल कौटुंबिक रहस्ये सार्वजनिकपणे उघड करु शकत नाही. माझे बाबा इंडस्ट्रीतील सर्वात देखण्या अभिनेत्यांपैकी एक होते. ते खूप सुंदर हसायचे. आणि मला एवढेच लक्षात ठेवायचे आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Rajnath Singh : पाकिस्तानविरुद्ध दीर्घ लढ्यास भारत तयार – राजनाथ सिंह

नवी दिल्ली : भारताने ऑपरेशन सिंदूर हे आपल्या अटींवर स्वेच्छेने थांबवले होते आणि गरज पडल्यास पाकिस्तान विरुद्ध

Women's T20 World Cup : महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; अशी केली जाणार निवड

मुंबई : २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा १२ जून ते ५ जुलै

Summer Special Trains : प्रवाशांच्या मागणीमुळे LTT वरून खास, मुंबई – मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या

मुंबई : प्रवाशांच्या मागणीची दखल घेऊन मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी

Bank Of Baroda : बँक ऑफ बडोदाच्या संपर्क केंद्रात भारतीय सांकेतिक भाषा सहाय्य सेवेची सुरुवात

मुंबई : भारताची आंतरराष्ट्रीय बँक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँक ऑफ बडोदाने (बँक) आपल्या संपर्क केंद्रात व्हिडीओ

Kalyan and Badlapur Power Blocks : कल्याण – बदलापूर दरम्यान ३री व ४थी लाईनवर उद्या आणि परवा विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक्स

मुंबई : कल्याण – बदलापूर दरम्यान ३री व ४थी लाईनवरील ओएचई (OHE) कामासाठी अप व डाउन दक्षिण-पूर्व मार्गावर दिनांक

Missing link : मिसिंग लिंकची गिनीज वर्ल्ड बुक मध्ये नोंद; जगातला सर्वात रुंद बोगदा म्हणून रेकॉर्ड केला नावावर

मुंबई : भारतीय इंजिनिअरींगचा अदभूत चमत्कार असलेला आणि मुंबई पुणे अंतर कमी करणारा सर्वात महत्वाच्या पुलाची आता