रेल्वे पकडण्यास झाला उशीर तर या मंत्र्यांनी प्लॅटफॉर्मवरच चढवली कार

लखनऊ:उत्तर प्रदेशचे (uttar pradesh) पशुधन मंत्री धर्मपाल सिंह सध्या चांगलेच चर्चेत आहेत. खरंतर या मंत्र्यांनी आपल्या पदाचा फायदा उचलला आहे आणि सर्व नियम तोडताना लखनऊच्या चारबाग रेल्वे स्टेशनच्या आत प्लॅटफॉर्मवरच आपली कार घेऊन गेले. नियमानुसार केवळ पायी जाणारे प्रवासीच रँपवरून जात एस्केलेटरचा वापर करतात. मंत्र्यांची गाडी जेव्हा प्लॅटफॉर्म नंबर एकवर आली तेव्हा प्रवासी चांगलेच घाबरले.


याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मंत्र्यांने केलेल्या या कामावर यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही चांगलीच मजा घेतली आहे.



पावसापासून बचावासाठी स्टेशनच्या आतच नेली कार


यूपीचे मंत्री धर्मपाल सिंह यांना ट्रेन पकडण्यास उशीर झाला होता. त्यामुळे ते सरळ कार घेऊन प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचले. अनेक लोकांचे म्हणणे आहे की जेव्हा मंत्री स्टेशनवर पोहोचले तेव्हा पाऊस कोसळत होता. पावसात भिजू नये म्हणून त्यांनी गाडी सरळ प्लॅटफॉर्मवरच नेली. यावेळेस त्यांनी रेल्वे नियमांचेही उल्लंघन केले. यावर अखिलेश यादव यांनीही मजा घेतली आहे. अखिलेश यादव यांनी या मंत्र्याला घेरताना म्हटले, बरे झाले की हे बुलडोझर घेऊन स्टेशनवर गेले नाहीत.


 





रेल्वे येत नाही तोपर्यंत स्टेशनवर उभी होती कार


मिळालेल्या माहितीनुसार, पशुधन मंत्री धर्मपाल सिंह लखनऊ येथून बरेली जाण्यासाठी पंजाब मेल पकडणार होते. त्यांना स्टेशनवर पोहोचण्यास उशीर झाला. त्यात पाऊसही कोसळत होता. यानंतर ते आपली फॉर्च्युनर घेऊन दिव्यांगासाठी बनलेल्या रँपवरून स्टेशनच्या आत गेले. प्लॅटफॉर्मवरच सरळ कार आलेली पाहून तेथील लोक चांगलेच घाबरले.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव