रेल्वे पकडण्यास झाला उशीर तर या मंत्र्यांनी प्लॅटफॉर्मवरच चढवली कार

  181

लखनऊ:उत्तर प्रदेशचे (uttar pradesh) पशुधन मंत्री धर्मपाल सिंह सध्या चांगलेच चर्चेत आहेत. खरंतर या मंत्र्यांनी आपल्या पदाचा फायदा उचलला आहे आणि सर्व नियम तोडताना लखनऊच्या चारबाग रेल्वे स्टेशनच्या आत प्लॅटफॉर्मवरच आपली कार घेऊन गेले. नियमानुसार केवळ पायी जाणारे प्रवासीच रँपवरून जात एस्केलेटरचा वापर करतात. मंत्र्यांची गाडी जेव्हा प्लॅटफॉर्म नंबर एकवर आली तेव्हा प्रवासी चांगलेच घाबरले.


याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मंत्र्यांने केलेल्या या कामावर यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही चांगलीच मजा घेतली आहे.



पावसापासून बचावासाठी स्टेशनच्या आतच नेली कार


यूपीचे मंत्री धर्मपाल सिंह यांना ट्रेन पकडण्यास उशीर झाला होता. त्यामुळे ते सरळ कार घेऊन प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचले. अनेक लोकांचे म्हणणे आहे की जेव्हा मंत्री स्टेशनवर पोहोचले तेव्हा पाऊस कोसळत होता. पावसात भिजू नये म्हणून त्यांनी गाडी सरळ प्लॅटफॉर्मवरच नेली. यावेळेस त्यांनी रेल्वे नियमांचेही उल्लंघन केले. यावर अखिलेश यादव यांनीही मजा घेतली आहे. अखिलेश यादव यांनी या मंत्र्याला घेरताना म्हटले, बरे झाले की हे बुलडोझर घेऊन स्टेशनवर गेले नाहीत.


 





रेल्वे येत नाही तोपर्यंत स्टेशनवर उभी होती कार


मिळालेल्या माहितीनुसार, पशुधन मंत्री धर्मपाल सिंह लखनऊ येथून बरेली जाण्यासाठी पंजाब मेल पकडणार होते. त्यांना स्टेशनवर पोहोचण्यास उशीर झाला. त्यात पाऊसही कोसळत होता. यानंतर ते आपली फॉर्च्युनर घेऊन दिव्यांगासाठी बनलेल्या रँपवरून स्टेशनच्या आत गेले. प्लॅटफॉर्मवरच सरळ कार आलेली पाहून तेथील लोक चांगलेच घाबरले.

Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके