रेल्वे पकडण्यास झाला उशीर तर या मंत्र्यांनी प्लॅटफॉर्मवरच चढवली कार

लखनऊ:उत्तर प्रदेशचे (uttar pradesh) पशुधन मंत्री धर्मपाल सिंह सध्या चांगलेच चर्चेत आहेत. खरंतर या मंत्र्यांनी आपल्या पदाचा फायदा उचलला आहे आणि सर्व नियम तोडताना लखनऊच्या चारबाग रेल्वे स्टेशनच्या आत प्लॅटफॉर्मवरच आपली कार घेऊन गेले. नियमानुसार केवळ पायी जाणारे प्रवासीच रँपवरून जात एस्केलेटरचा वापर करतात. मंत्र्यांची गाडी जेव्हा प्लॅटफॉर्म नंबर एकवर आली तेव्हा प्रवासी चांगलेच घाबरले.


याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मंत्र्यांने केलेल्या या कामावर यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही चांगलीच मजा घेतली आहे.



पावसापासून बचावासाठी स्टेशनच्या आतच नेली कार


यूपीचे मंत्री धर्मपाल सिंह यांना ट्रेन पकडण्यास उशीर झाला होता. त्यामुळे ते सरळ कार घेऊन प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचले. अनेक लोकांचे म्हणणे आहे की जेव्हा मंत्री स्टेशनवर पोहोचले तेव्हा पाऊस कोसळत होता. पावसात भिजू नये म्हणून त्यांनी गाडी सरळ प्लॅटफॉर्मवरच नेली. यावेळेस त्यांनी रेल्वे नियमांचेही उल्लंघन केले. यावर अखिलेश यादव यांनीही मजा घेतली आहे. अखिलेश यादव यांनी या मंत्र्याला घेरताना म्हटले, बरे झाले की हे बुलडोझर घेऊन स्टेशनवर गेले नाहीत.


 





रेल्वे येत नाही तोपर्यंत स्टेशनवर उभी होती कार


मिळालेल्या माहितीनुसार, पशुधन मंत्री धर्मपाल सिंह लखनऊ येथून बरेली जाण्यासाठी पंजाब मेल पकडणार होते. त्यांना स्टेशनवर पोहोचण्यास उशीर झाला. त्यात पाऊसही कोसळत होता. यानंतर ते आपली फॉर्च्युनर घेऊन दिव्यांगासाठी बनलेल्या रँपवरून स्टेशनच्या आत गेले. प्लॅटफॉर्मवरच सरळ कार आलेली पाहून तेथील लोक चांगलेच घाबरले.

Comments
Add Comment

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा