chandrayaan 3: चांद्रयान-३च्या यशस्वी लँडींगनंतर टीम इंडियाचा जल्लोष

चांद्रयान-३च्या लँडींगमुळे देशभर उत्साह, आनंदाचे वातावरण असताना आयर्लंडमध्ये टी-२० मालिका खेळत असलेल्या भारतीय संघानेही इस्त्रोच्या या मोहिमेचे जल्लोषात स्वागत केले. टीम इंडियाच्या या जल्लोषाचा व्हीडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.


ऐतिहासिक अशा चांद्रयान-३च्या लँडींगमुळे बुधवारी देशभर उत्साहाचे वातावरण होते. जगाचेही या मोहिमेकडे लक्ष होते. हे लँडींग करोडो भारतीयांसह जगभरातील असंख्य लोकांनी पाहिले. भारतीय संघही हे लँडींग पाहण्यासाठी एकत्र जमला होता. लँडींग पाहण्याकरिता भारतीय संघासाठी यावेळी खास व्यवस्था करण्यात आली होती. भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराह, प्रशिक्षक सितांशू कोटक आणि अन्य खेळाडू यावेळी एकत्रित जमले होते. त्यांनी हा ऐतिहासिक क्षण डोळ्यांत साठवून ठेवला. त्यानंतर भारतीय खेळाडू हे सामन्याच्या तयारीला लागले.





बुधवारी भारत आणि यजमान आयर्लंड यांच्यात टी-२० मालिकेतील शेवटचा सामना होणार होता. या सामन्याआधी भारतीय संघाने चांद्रयान-३ चे यशस्वी लँडींग पाहिले. बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास चांद्रयान-३ चे लँडीग होणार होते आणि हा ऐतिहासिक क्षण भारतीय संघाने पाहायचा ठरवला. यासाठी भारतीय संघाने खास व्यवस्था केली होती. भारतीय संघाने चांद्रयान-३ चे यशस्वी लँडींग झाल्यावर जोरदार जल्लोषही केला. या भारताच्या जल्लोषाचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

भारताची अमेरिकेला निर्यात थांबणार?

अमेरिकेकडून रशियावर ५०० टक्के आयात कर ब्राझिल आणि चीनलाही इशारा पुतिन निष्पाप लोकांची हत्या करत असल्याचा

देशातील पहिल्या ‘डिजिटल जनगणने’ला एक एप्रिलपासून सुरुवात

नवी दिल्ली : भारत सरकार २०२७ मध्ये जनगणना करणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा, म्हणजेच घरांची यादी बनवण्याचे काम, १

तामिळनाडूतील निवडणुकीसाठी भाजपची ५६ जागा आणि ३ मंत्रिपदांची मागणी

चेन्नई  : भाजपने मागील वर्षी तामिळनाडूत जयललिता यांचा पक्ष एआयडिएमके यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक

तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड

नवी दिल्ली  : पश्चिम बंगालच्या राजकारणात गुरुवारी पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे मोठी खळबळ

पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत ३ वर्षांची सवलत

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश पोलीस दलात भरती होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी योगी सरकारने नववर्षाची

चलन निर्मितीत मोठा बदल; चलन कागदनिर्मिसाठी अत्याधुनिक तंत्र कार्यन्वयित

मुंबई : भारताच्या चलनात नाण्यांप्रमाणे कागदी नोटांनाही तितकेच महत्व आहे. पाचशे, दोन हजार यांसारख्या अनेक नोटा आज