chandrayaan 3: चांद्रयान-३च्या यशस्वी लँडींगनंतर टीम इंडियाचा जल्लोष

चांद्रयान-३च्या लँडींगमुळे देशभर उत्साह, आनंदाचे वातावरण असताना आयर्लंडमध्ये टी-२० मालिका खेळत असलेल्या भारतीय संघानेही इस्त्रोच्या या मोहिमेचे जल्लोषात स्वागत केले. टीम इंडियाच्या या जल्लोषाचा व्हीडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.


ऐतिहासिक अशा चांद्रयान-३च्या लँडींगमुळे बुधवारी देशभर उत्साहाचे वातावरण होते. जगाचेही या मोहिमेकडे लक्ष होते. हे लँडींग करोडो भारतीयांसह जगभरातील असंख्य लोकांनी पाहिले. भारतीय संघही हे लँडींग पाहण्यासाठी एकत्र जमला होता. लँडींग पाहण्याकरिता भारतीय संघासाठी यावेळी खास व्यवस्था करण्यात आली होती. भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराह, प्रशिक्षक सितांशू कोटक आणि अन्य खेळाडू यावेळी एकत्रित जमले होते. त्यांनी हा ऐतिहासिक क्षण डोळ्यांत साठवून ठेवला. त्यानंतर भारतीय खेळाडू हे सामन्याच्या तयारीला लागले.





बुधवारी भारत आणि यजमान आयर्लंड यांच्यात टी-२० मालिकेतील शेवटचा सामना होणार होता. या सामन्याआधी भारतीय संघाने चांद्रयान-३ चे यशस्वी लँडींग पाहिले. बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास चांद्रयान-३ चे लँडीग होणार होते आणि हा ऐतिहासिक क्षण भारतीय संघाने पाहायचा ठरवला. यासाठी भारतीय संघाने खास व्यवस्था केली होती. भारतीय संघाने चांद्रयान-३ चे यशस्वी लँडींग झाल्यावर जोरदार जल्लोषही केला. या भारताच्या जल्लोषाचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची शिफारस

नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश बीआर गवई (भूषण रामकृष्ण गवई) यांनी सर्वोच्च न्यायालयातील त्यांच्यानंतरचे

नोव्हेंबरपासून देशात सुरू होणार नवे नियम, जाणून घ्या सविस्तर!

नवी दिल्ली: ऑक्टोबर महिना काहीच दिवसात संपणार असून येणाऱ्या नवीन महिन्यापासून देशभरात आधारकार्डपासून

१ नोव्हेंबरपासून जीएसटी नोंदणी आणखी सोपी होणार

नवी दिल्ली :  केंद्र सरकारने १ नोव्हेंबरपासून वस्तू आणि सेवा कर नोंदणी आणखी सोपी करण्यासाठी नवी प्रणाली सुरू

जयंत नारळीकर यांना मरणोत्तर ‘विज्ञान रत्न’

नवी दिल्ली : विज्ञान, तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाधारित नवोन्मेषाच्या विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट आणि

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.