Mizoram Railway Bridge Collapse : मिझोराममध्ये निर्माणाधीन रेल्वे पूल कोसळला; १७ मजुरांचा मृत्यू, ३० ते ४० मजूर अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

Share

ऐझॉल : मिझोरामची (Mizoram) राजधानी ऐझॉलजवळ (Aizawl) निर्माणाधीन रेल्वे पूल कोसळल्याने (Railway Bridge Collapse) मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत १७ मजुरांचा मृत्यू झाला. ढिगाऱ्याखाली अजूनही ३० ते ४० मजूर अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मजुरांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

हा पूल दिल्लीच्या कुतुबमिनारपेक्षा उंच आहे. या पुलावरून रेल्वे वाहतूक सुरू झाल्यानंतर मिझोराम देशाच्या विशाल रेल्वे नेटवर्कशी जोडले जाईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.

ऐझॉलजवळील सायरंग येथे बांधकामाधीन रेल्वे ओव्हरब्रिज बुधवारी कोसळून किमान १७ कामगारांचा मृत्यू झाला, असे मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर सांगितले.

“निर्माणाधीन, ऐझॉल जवळ सैरंग येथे रेल्वे ओव्हरब्रिज आज कोसळला; किमान १७ कामगारांचा मृत्यू झाला. बचावकार्य सुरू आहे,” झोरामथांगा यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, त्यांना या दुर्घटनेने खूप दु:ख झाले आहे आणि जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी इच्छा व्यक्त करताना सर्व शोकग्रस्त कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच बचाव कार्यात मदत करण्यासाठी मोठ्या संख्येने आलेल्या लोकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही पूल दुर्घटनेमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधानांनी प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना PMNRF कडून २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये मदत जाहीर केली आहे.

“मिझोराममधील पुलाच्या दुर्घटनेमुळे दुःख झाले आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याबद्दल शोक. जखमी लवकर बरे होवोत. बचाव कार्य सुरू आहे, आणि बाधितांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे,” असे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

एका ट्विटमध्ये, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की मृतांपैकी काही त्यांच्या राज्यातील मालदा जिल्ह्यातील आहेत.

“मी माझ्या मुख्य सचिवांना मिझोराम प्रशासनाशी त्वरित बचाव आणि मदत कार्यासाठी समन्वय साधण्याचे निर्देश दिले आहेत. मालदा जिल्हा प्रशासनाला सर्व शक्य मदत करण्यासाठी शोकग्रस्त कुटुंबांपर्यंत पोहोचण्यास सांगण्यात आले आहे,” असे त्या म्हणाल्या. बॅनर्जी यांनी पीडित कुटुंबाच्या नातेवाईकांना योग्य नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे.

Recent Posts

Cow slaughter case : रायगड जिल्ह्यातील महाड येथील गोहत्येचा मुद्दा अधिवेशनात गाजणार!

DYSP शंकर काळे यांच्या निलंबनाची शक्यता? रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र भूमी म्हणून रायगड…

23 mins ago

Jalna News : अ‍ॅक्शन मोड! बेकायदा अवैध सोनोग्राफी सेंटरवर आरोग्य पथकाची धाड

कपाट भरून गर्भपाताची औषधे, लाखोंची रोकड पाहून अधिकाऱ्यांच्या उंचावल्या भुवया जालना : महाराष्ट्रात गर्भवती महिलांची…

23 mins ago

Raj Thackeray : १६ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ खटल्यात राज ठाकरे निर्दोष!

इस्लामपूर न्यायालयाचा मोठा निर्णय सांगली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याबाबत एक मोठी…

46 mins ago

Dharmaveer 2 : ज्याच्या घरातील स्त्री दुःखी त्याची बरबादी नक्की!

मराठीसह हिंदीत 'धर्मवीर २'चा धगधगता टीझर आऊट मुंबई : कट्टर हिंदुत्ववादी आणि शिवसैनिक धर्मवीर आनंद…

2 hours ago

Assam Rain : आसाममध्ये पावसाचा हाहाकार! पुरामुळे ५२ लोकांनी गमावले प्राण

८ वर्षांचा मुलगा बेपत्ता; वडील शोधत असताना मुलाची केवळ चप्पल मिळाली दिसपूर : सध्या देशभरात…

3 hours ago

Raigad Accident : भीषण अपघात! दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक

१५ ते २० प्रवासी जखमी, २ जण गंभीर रायगड : काही दिवसांपूर्वी पोलादपूर (Poladpur) येथे…

3 hours ago