Ind vs Ire: भारत वि आयर्लंड तिसरा सामना रद्द, भारताने मालिका २-०ने जिंकली

डबलिन: भारत (india) आणि आयर्लंड (ireland) यांच्यातील टी-२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारत आणि आयर्लंड यांच्यातील तिसरा आणि शेवटचा सामना आज रंगणार होता. मात्र सुरूवातीपासूनच पावसाने खोडा घातला.


पावसामुळे टॉस उशिराने होणार असे सांगण्यात आले मात्र पाऊस काही थांबण्यास तयार नव्हता. अखेर दीर्घकाळ वाट पाहिल्यानंतर हा सामना रद्द करण्यात आला आहे. भारताने या मालिकेतील दोन सामने आधीच खिशात घातले आहेत. त्यामुळे भारताने तीन सामन्यांची ही मालिका २-० अशी जिंकली आहे.


जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयर्लंडमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. पहिल्या दोन सामन्यात भारताच्या संघाने जबरदस्त कामगिरी करत मालिकेत विजय मिळवले होते.


आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही पावसाने व्यत्यय आणला होता. तो सामना भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार दोन धावांनी जिंकला होता. त्यानंतरच्या दुसऱ्या सामन्यात भारताने एकहाती विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात भारताने १८६ धावांचे आव्हान आयर्लंडसमोर दिले होते मात्र आयर्लंडने झुंज देत १५२ धावा केल्या.

Comments
Add Comment

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव