Chandrayaan 3: हा क्षण विकसित भारताच्या शंखनादाचा आहे - पंतप्रधान मोदी

  102

मुंबई: चांद्रयान ३च्या (chandrayaan 3) यशस्वी लँडिंगनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी दक्षिण आफ्रिकेतून ऑनलाईन पद्धतीने चांद्रयान ३चे लँडिंग पाहिले. जसे लँडर विक्रमने चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवले तसे इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी जाहीर केले की आपण चंद्रावर पोहोचलो. प्रमुखांनी इतकं म्हणताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हातात झेंडा घेऊन फडकावू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसत होते.


पंतप्रधान याबाबत म्हणाले जेव्हा आपण इतिहास बनताना पाहतो तेव्हा जीवन धन्य होते. अशा ऐतिहासिक घटना आपल्या आयुष्यात चिरंजीव चेतना बनून राहतात. हा क्षण विकसित भारताचा शंखनाद आहे. हा क्षण नव्या भारताचा जयघोष आहे. हा क्षण कठीण महासागर पार करण्याचा आहे. हा क्षण विजयाच्या चंद्रपथावर चालण्याचा आहे. हा क्षण अविस्मरणीय आहे.


 


धरतीवर संकल्प, चंद्रावर साकार


मोदी म्हणाले, हा क्षण भारताच्या विजयाचा आहे. आम्ही धरतीवर संकल्प केला आणि चंद्रावर तो साकार केला. आज आम्ही अंतराळात नव्या उड्डाणाचे साक्षीदार बनले आहेत. मोजी म्हणाले हा क्षण १४० कोटी लोकांसाठी उमंग देणारा आहे.


आम्ही ब्रिक्स परिषदेत भाग घेण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत आहोत मात्र माझे मन चांद्रयान ३ जवळच बोते. मी चांद्रयान ३ आणि इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करतो. या अद्भुत क्षणासाठी १४० कोटी देशवासियांना कोटी कोटी अभिनंदन करतो.


 


चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत पहिला देश


भारत चंद्राच्या त्या दक्षिण ध्रुवावर पोहोचला आहे जेथे जगातील अद्याप कोणत्याच देशाला जाता आलेले नाही. आता चंद्राबाबतचे सर्व गैरसमज दूर होतील. कथानके बदलतील आणि नव्या पिढीसाठी म्हणीही बदलतील.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )