Chandrayaan 3: हा क्षण विकसित भारताच्या शंखनादाचा आहे - पंतप्रधान मोदी

  104

मुंबई: चांद्रयान ३च्या (chandrayaan 3) यशस्वी लँडिंगनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी दक्षिण आफ्रिकेतून ऑनलाईन पद्धतीने चांद्रयान ३चे लँडिंग पाहिले. जसे लँडर विक्रमने चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवले तसे इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी जाहीर केले की आपण चंद्रावर पोहोचलो. प्रमुखांनी इतकं म्हणताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हातात झेंडा घेऊन फडकावू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसत होते.


पंतप्रधान याबाबत म्हणाले जेव्हा आपण इतिहास बनताना पाहतो तेव्हा जीवन धन्य होते. अशा ऐतिहासिक घटना आपल्या आयुष्यात चिरंजीव चेतना बनून राहतात. हा क्षण विकसित भारताचा शंखनाद आहे. हा क्षण नव्या भारताचा जयघोष आहे. हा क्षण कठीण महासागर पार करण्याचा आहे. हा क्षण विजयाच्या चंद्रपथावर चालण्याचा आहे. हा क्षण अविस्मरणीय आहे.


 


धरतीवर संकल्प, चंद्रावर साकार


मोदी म्हणाले, हा क्षण भारताच्या विजयाचा आहे. आम्ही धरतीवर संकल्प केला आणि चंद्रावर तो साकार केला. आज आम्ही अंतराळात नव्या उड्डाणाचे साक्षीदार बनले आहेत. मोजी म्हणाले हा क्षण १४० कोटी लोकांसाठी उमंग देणारा आहे.


आम्ही ब्रिक्स परिषदेत भाग घेण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत आहोत मात्र माझे मन चांद्रयान ३ जवळच बोते. मी चांद्रयान ३ आणि इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करतो. या अद्भुत क्षणासाठी १४० कोटी देशवासियांना कोटी कोटी अभिनंदन करतो.


 


चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत पहिला देश


भारत चंद्राच्या त्या दक्षिण ध्रुवावर पोहोचला आहे जेथे जगातील अद्याप कोणत्याच देशाला जाता आलेले नाही. आता चंद्राबाबतचे सर्व गैरसमज दूर होतील. कथानके बदलतील आणि नव्या पिढीसाठी म्हणीही बदलतील.

Comments
Add Comment

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही- पंतप्रधानांची ग्वाही, अमेरिकेच्या ५० टक्के टॅरिफवर व्यक्त केला वज्र निर्धार

अहमदाबाद : शेतकरी, लघु उद्योजक आणि पशुपालकांचे हित हेच माझ्यासाठी सर्वोच्च असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र

पंतप्रधान मोदींची पदवी सार्वजनिक करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने केले रद्द

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवीची माहिती सार्वजनिक करण्याचे केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी)

भटक्या कुत्र्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला

नवी दिल्ली : दिल्लीच्या शकरपूर भागात भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा

जैसलमेरमध्ये खोदकामात आढळले २०१ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या फायटोसॉरचे जीवाश्म

जैसलमेर: राजस्थानमधील एका गावात तलावाजवळ डायनासॉर काळातील जीवाश्म सापडले असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत

हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस! पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने