Chanadrayaan 3: यशस्वी चांद्र मोहीम आणि मोदींनी यांना केला पहिला फोन...

नवी दिल्ली : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत जगातील पहिला देश बनला आहे. दक्षिण ध्रुवावर 'चांद्रयान ३' (chandrayaan 3) ने यशस्वी पाऊल ठेवल्यानंतर संपूर्ण देशात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण आहे. चांद्रयान ३ च्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोची (isro) टीम आणि सर्व देशवासियांचे दक्षिण आ्फ्रिकेतून अभिनंदन केले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगेचच इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांना फोन करून लगेच अभिनंदन केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांच्याशी मोबाईलवर बातचीतदरम्यान म्हणाले, सोमनाथजी तुमचे नाव सोमनाथ आहे आणि सोमनाथ नाव चंद्राशी जोडलेले आहे. यासाठी तुमचे कुटुंबीय नक्कीच आनंदित असतील. माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या टीमला खूप खूप अभिनंदन. सगळ्यांचे माझ्याकडून अभिनंदन.शक्य होईल तितके लवकरच मी तुम्हाला भेटून अभिनंदन करेन. खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार.


 


याआधी चांद्रयान ३च्या लँडिंगनंतर लगेचच देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपण जेव्हा आपल्या डोळ्यासमोर असा इतिहास बनताना पाहिले तर जीवन धन्य होऊन जाते. अशा ऐतिहासिक घटना राष्ट्रीय जीवनात चिरंजीवी राहतात. हा क्षण अविस्मरणीय आहे. हा क्षण विकसित भारताच्या शंखनादाचा आहे. नव्या भारताचा जयघोष आहे. हा क्षण कठीण महासागर पार कण्याचा आहे. हा क्षण विजयाच्या चंद्र पथावर चालण्याचा आहे.

Comments
Add Comment

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना