Chanadrayaan 3: यशस्वी चांद्र मोहीम आणि मोदींनी यांना केला पहिला फोन...

नवी दिल्ली : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत जगातील पहिला देश बनला आहे. दक्षिण ध्रुवावर 'चांद्रयान ३' (chandrayaan 3) ने यशस्वी पाऊल ठेवल्यानंतर संपूर्ण देशात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण आहे. चांद्रयान ३ च्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोची (isro) टीम आणि सर्व देशवासियांचे दक्षिण आ्फ्रिकेतून अभिनंदन केले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगेचच इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांना फोन करून लगेच अभिनंदन केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांच्याशी मोबाईलवर बातचीतदरम्यान म्हणाले, सोमनाथजी तुमचे नाव सोमनाथ आहे आणि सोमनाथ नाव चंद्राशी जोडलेले आहे. यासाठी तुमचे कुटुंबीय नक्कीच आनंदित असतील. माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या टीमला खूप खूप अभिनंदन. सगळ्यांचे माझ्याकडून अभिनंदन.शक्य होईल तितके लवकरच मी तुम्हाला भेटून अभिनंदन करेन. खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार.


 


याआधी चांद्रयान ३च्या लँडिंगनंतर लगेचच देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपण जेव्हा आपल्या डोळ्यासमोर असा इतिहास बनताना पाहिले तर जीवन धन्य होऊन जाते. अशा ऐतिहासिक घटना राष्ट्रीय जीवनात चिरंजीवी राहतात. हा क्षण अविस्मरणीय आहे. हा क्षण विकसित भारताच्या शंखनादाचा आहे. नव्या भारताचा जयघोष आहे. हा क्षण कठीण महासागर पार कण्याचा आहे. हा क्षण विजयाच्या चंद्र पथावर चालण्याचा आहे.

Comments
Add Comment

Vapi Chemical Units : वापी औद्योगिक वसाहतीला युद्धाचा विळखा! कच्चे तेल आणि कच्च्या मालाचे दर भडकल्याने उत्पादन कोलमडले

वापी : पश्चिम आशियात (इराण-अमेरिका-इस्रायल) भडकलेल्या युद्धाच्या ज्वाला केवळ त्या भूप्रदेशापुरत्या मर्यादित न

Shreyansh Patel : बुद्धीबळाच्या पटावर अडीच वर्षांच्या चिमुरड्याची 'शह-मात'! श्रेयांश पटेलने रचला विश्वविक्रम

हैदराबाद : बुद्धीबळ म्हणजे संयम आणि तल्लख बुद्धिमत्तेचा खेळ. जिथे मोठ्यांनाही विचार करावा लागतो, तिथे एका अवघ्या

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे