BMC : मुंबईत पुढील २४ तास अनेक भागात पाणी कपात!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) मुंबईतील एम पूर्व (M East) आणि एम पश्चिम (M West) भागामध्ये २४ आणि २५ ऑगस्ट या दिवशी पाणी बंद (Water cut) राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सकाळी १० पासून पाणी बंद राहणार असल्याचे पालिकेने कळवले आहे.


एम पश्चिम मध्ये चेंबूर आणि एम पूर्व मध्ये मानखुर्द, देवनार आणि शिवाजी नगर या भागाचा समावेश आहे. या भागामध्ये दुरूस्तीच्या काही कामांसाठी पाणी कपात केली जाणार आहे. पालिका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, ट्रॉम्बे उच्च-स्तरीय जलाशय (Trombay High-Level Reservoir) मध्ये हे काम केले जाणार आहे. ट्रॉम्बे उच्च-स्तरीय जलाशय चेंबूरच्या अणुशक्ती नगर येथे आहे.


याव्यतिरिक्त, महानगरपालिकेने गुरुवार आणि शुक्रवार दरम्यान १,८०० मिमी इनलेटचा वापर करून पुन्हा पाणी भरण्याची योजना आखली आहे.


महानगरपालिकेने संपूर्ण पाणीकपात लागू होणाऱ्या भागांची यादी जाहीर केली आहे. अधिकार्‍यांनी प्रभावित वॉर्डातील रहिवाशांना पुरवठा निलंबन लागू होण्यापूर्वी पुरेसा पाणीसाठा सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे. महानगरपालिकेने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये पुरवठा खंडित होण्याच्या कालावधीत पाणी भरून ठेवत रहिवाशांच्या सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.


दरम्यान, मंगळवारी पाण्याची पाईपलाईन तुटल्याने महानगरपालिकेच्या एच वेस्ट वॉर्डमध्ये खार दांडा येथील काही भागाचा पाणीपुरवठा प्रभावित झाला. मोहम्मद रफी चौकात पाईप खराब झाला आहे. वांद्रे पश्चिमेला मेट्रो रेल्वेचे काम सुरू असल्याने त्याचा परिणाम झाला आहे. खार दांडा, गझदरबंध, दांड पाडा आणि खारच्या काही भागांना पाणीपुरवठा होण्यास विलंब झाला असल्याचे बीएमसीच्या एच वेस्ट वॉर्डने ट्विटरवर म्हटले आहे.


दरम्यान, महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या मुंबई तुळशी, तानसा, विहार, भातसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा या सात जलाशयांमधील एकत्रित पाणीसाठा आता १२,११,६८६ दशलक्ष लिटर किंवा ८३.७२ टक्के इतका आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या, मध्य, आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; वेळ पाहूनच बाहेर पडा

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर

राज्यात ‘वन स्टेट, वन पोर्टल’ संकल्पनेला गती; महा सारथी पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : राज्यात डिजिटल गव्हर्नन्स अधिक सक्षम व नागरिककेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वन स्टेट, वन