Onion Issue : कांदा २,४१० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करणार

केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची महत्वपूर्ण घोषणा


नवी दिल्ली : केंद्र सरकार नाफेडमार्फत (NAFED) दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी केली आहे. त्यामुळे काही अंशी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.


कांदा प्रश्नावर (Onion Issue) राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Mudne) आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यात आज दिल्ली येथे झालेल्या बैठकीत कांदा प्रश्नावर महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली.


केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क वाढविल्यामुळे (Export Duty) गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत होते. त्यामुळे आंदोलने करण्यात आली. रास्ता रोको करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेत कांदा प्रश्नावर चर्चा केली. यावर पियुष गोयल यांनी सकारात्मक उत्तर देत कांदा प्रश्नावर दिलासा देणारी घोषणा केली आहे. त्यानुसार केंद्र सरकार नाफेडमार्फत दोन लाख मेट्रिक टन कांदा २ हजार ४१० रुपये प्रतिक्विंटल भावाने खरेदी करणार असल्याची घोषणा मंत्री पियुष गोयल यांनि केली आहे.

Comments
Add Comment

Raja Raghuvanshi Case: 11 महिन्यांनतर सोनम जेलमधून बाहेर, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित

शिलॉन्ग  Shillong : राजा रघुवंशी हत्या प्रकरणाने संपूर्ण देशभरात खळबळ उडवून दिली होती. याच राजा रघुवंशी हत्या प्रकरणात

भीषण ! एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग , अल्पवयीन मुलीसह 5 जणांचा करून अंत

दिल्ली : दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण दुर्घटना झाली आहे. मुलाची नोकरी मिळवण्याची इच्छा पूर्ण

Wall collapse near Hospital : रुग्णालयाजवळची संरक्षक भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू, मृतांमध्ये ३ मुलांचा समावेश

बंगळुरू : कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूत बोअरिंग आणि लेडी कर्झन रुग्णालयाजवळची संरक्षक भिंत कोसळून सात

गॅस सिलेंडर मोफत हवा आहे ? मग मोदी सरकारची 'ही' भन्नाट योजना तुम्हांला माहित असायलाच हवी

ग्रामीण भागात अजूनही अनेक महिला पारंपरिक इंधनावर स्वयंपाक करतात, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

Parth Pawar : विरोध असलेल्या VSR कंपनीच्या विमानातून पार्थ पवार यांनी केला प्रवास

नवी दिल्ली : राष्ट्रीवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र

West Bengal Election 2026 : पश्चिम बंगालमध्ये आज दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान झाले सुरू

कोलकाता: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू झाले आहे. मतदान केंद्रांबाहेर