Talathi Exam Amravati : एक वर्षाच्या तान्ह्या मुलाला घरी ठेवून आई आली होती तलाठीची परीक्षा द्यायला...

  134

सर्व्हरच्या समस्येमुळे सोबत आलेला नवरा संतप्त


अमरावती : आज महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये तलाठी भरती परीक्षा पार पडते आहे. परंतु सर्व्हर डाऊन (Server Down ) असल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला आहे. सध्या ही समस्या सुटली असून विद्यार्थ्यांना हळूहळू आत सोडण्यात येत आहे, मात्र या गोंधळामुळे विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्यासोबत आलेले नातेवाईकही संतप्त झाले आहेत. अमरावतीच्या (Amravati) परीक्षा केंद्रावर एक महिला आपल्या एक वर्षाच्या तान्ह्या मुलाला घरी ठेवून तलाठीची परीक्षा देण्याकरता आली होती. तिच्यासोबत तिचा नवरा देखील याठिकाणी आला होता. यावेळेस घरी असलेल्या मुलाच्या काळजीने बापाने संतप्त प्रतिक्रिया दिली.


त्या बापाने सांगितले की, मी माझ्या पत्नीसोबत इथे आलो होतो. आमचं बारा महिन्यांचं मूल घरी ठेवून आम्ही इथे आलो आहोत. सकाळी सहा वाजता आम्ही इथे पोहोचलो आणि त्या गडबडीत अजून नाश्ताही केलेला नाही. परिक्षेसाठी यांनी नऊची वेळ दिली होती आणि आता दहा वाजल्यानंतर हे मुलांना आत सोडत आहेत. आता आम्ही घरी कधी जाऊ आणि मुलाला कधी पाहू? हे अधिकारी फक्त अरेरावी करतात. पण यांनी ही समस्या आधीच सोडवायला हवी होती. तांत्रिक बिघाडाचे कारण देता पण परीक्षा तर तीन दिवस सुरु आहे, मग तेव्हा ही समस्या कशी नाही उद्भवली? ९०० रुपये फी तुम्ही कशासाठी घेतली? हा सगळा ओंगळ कारभार आहे, दुसरं काही नाही, अशी प्रतिक्रिया चिंताग्रस्त बापाने दिली.


महसूल विभागाकडून तलाठी पदाच्या ४ हजार ६४४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या जागांसाठी राज्यातून १० लाख ४१ हजार इच्छुकांनी अर्ज सादर केला आहे. तलाठी पदाच्या परीक्षेच्या शुल्कावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. आता ऐन परीक्षेच्या वेळी मात्र सर्व्हर डाऊन असल्यानं हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला होता. सध्या सर्व्हरची समस्या अनेक केंद्रांवर सुटली असून परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना आत प्रवेश देण्यात येत आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित