Talathi Exam Amravati : एक वर्षाच्या तान्ह्या मुलाला घरी ठेवून आई आली होती तलाठीची परीक्षा द्यायला...

सर्व्हरच्या समस्येमुळे सोबत आलेला नवरा संतप्त


अमरावती : आज महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये तलाठी भरती परीक्षा पार पडते आहे. परंतु सर्व्हर डाऊन (Server Down ) असल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला आहे. सध्या ही समस्या सुटली असून विद्यार्थ्यांना हळूहळू आत सोडण्यात येत आहे, मात्र या गोंधळामुळे विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्यासोबत आलेले नातेवाईकही संतप्त झाले आहेत. अमरावतीच्या (Amravati) परीक्षा केंद्रावर एक महिला आपल्या एक वर्षाच्या तान्ह्या मुलाला घरी ठेवून तलाठीची परीक्षा देण्याकरता आली होती. तिच्यासोबत तिचा नवरा देखील याठिकाणी आला होता. यावेळेस घरी असलेल्या मुलाच्या काळजीने बापाने संतप्त प्रतिक्रिया दिली.


त्या बापाने सांगितले की, मी माझ्या पत्नीसोबत इथे आलो होतो. आमचं बारा महिन्यांचं मूल घरी ठेवून आम्ही इथे आलो आहोत. सकाळी सहा वाजता आम्ही इथे पोहोचलो आणि त्या गडबडीत अजून नाश्ताही केलेला नाही. परिक्षेसाठी यांनी नऊची वेळ दिली होती आणि आता दहा वाजल्यानंतर हे मुलांना आत सोडत आहेत. आता आम्ही घरी कधी जाऊ आणि मुलाला कधी पाहू? हे अधिकारी फक्त अरेरावी करतात. पण यांनी ही समस्या आधीच सोडवायला हवी होती. तांत्रिक बिघाडाचे कारण देता पण परीक्षा तर तीन दिवस सुरु आहे, मग तेव्हा ही समस्या कशी नाही उद्भवली? ९०० रुपये फी तुम्ही कशासाठी घेतली? हा सगळा ओंगळ कारभार आहे, दुसरं काही नाही, अशी प्रतिक्रिया चिंताग्रस्त बापाने दिली.


महसूल विभागाकडून तलाठी पदाच्या ४ हजार ६४४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या जागांसाठी राज्यातून १० लाख ४१ हजार इच्छुकांनी अर्ज सादर केला आहे. तलाठी पदाच्या परीक्षेच्या शुल्कावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. आता ऐन परीक्षेच्या वेळी मात्र सर्व्हर डाऊन असल्यानं हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला होता. सध्या सर्व्हरची समस्या अनेक केंद्रांवर सुटली असून परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना आत प्रवेश देण्यात येत आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मुलतानी बेकरीच्या मालकाने उचलेले टोकाचे पाऊल; सोलापुरात खळबळ

सोलापूर: सोलापुरात एकेकाळी अत्यंत प्रसिद्ध असलेल्या मुलतानी बेकरीचे मालक सुनील मोतीलाल सदारंगानी यांनी

Mumbai Pune Expressway: तिसऱ्या दिवशीही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे जैसे थे..; प्रवाशी हतबल

मुंबई: आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी पहाटेपासूनच मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी झाल्याने

HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी; HSRP नंबर प्लेट बसवली नाही तर...

वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. तुम्ही जर अजूनही तुमच्या गाडीला नवीन नंबरप्लेट बसवून घेतली नसेल तर तुमचे

Jalna Black Magic News: जालन्यात एका हॉटेलसमोर लिंबू आणि बाहुल्या आढळल्या, काळ्या जादूने गावात खळबळ

जालना: जालना जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोकरदन तालुक्यामध्ये एका अज्ञात महिलेने हॉटेलसमोर

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक