उपमुख्यमंत्री पवारांच्या प्रश्नावर चिडले मुख्यमंत्री, फडणवीसांनी घेतली धाव

मुंबई: काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील रुग्णालयात काही रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तिखट सवाल केला. मात्र एकनाथ शिंदेंनीही पवार यांनाच त्यांच्याच भाषेत याचे उत्तर दिले. दरम्यान, वादाची ठिणगी पडेल असे दिसताच वेळीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात हस्तक्षेप केला.


शुक्रवारी झालेल्या मंत्र्यांच्या खासगी बैठकीदरम्यान हे चित्र पाहायला मिळाले. राज्यातील सध्याचे प्रश्न, तसेच नियोजन, त्यावरील उपाययोजना याबाबत मंत्र्यांची शुक्रवारी बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात झालेल्या मृत्यूप्रकरणाचा मुद्दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला.


यावेळेस तुमच्या ठाण्यात इतके मृत्यू कसे झाले? घटना गंभीर आहे. काळजी घेतली पाहिजे. असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला. अजित पवारांच्या या प्रश्नाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिडले आणि त्यांनी त्याच अंदाजात पवार यांना उत्तर दिले. दरम्यान, त्यांच्या या बोलण्याचे रूपांतर वादात होऊ नये म्हणून वेळीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला आणि प्रकरण तिथेच थांबवले.


जेव्हा अजित पवार यांनी कळवा रुग्णालय मृत्यूप्रकरणी सवाल उपस्थित केला तेव्हा मुख्यमंत्री शिंदेंनी या घटनेची संपूर्ण माहिती दिली. रुग्णांचा मृत्यू कसा झाला? किती रुग्ण गंभीर स्थितीत होते. किती रुग्ण शेवटच्या घटकेला रुग्णालयात आणले गेले? तसेच रुग्णालयावर असलेला तणाव याची सर्व माहिती त्यांनी अजित पवार यांना दिली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. दरम्यान, त्यांना समजले की हा विषय अधिक वाढू नये म्हणून त्यांनी लगेचच दुसरा विषय काढत या मुद्द्यावरून साऱ्यांचे लक्ष हटवले.

Comments
Add Comment

Central Railway : मुसळधार पावसानंतर रेल्वेची शर्यत! लोणावळा–कर्जत मार्गावर १,१०० हून अधिक कामगारांचे युद्धपातळीवर काम; एक रेल्वे मार्ग सुरू

मुंबई : लोणावळा–कर्जत घाट विभागात मुसळधार पावसामुळे झालेल्या दरडी कोसळण्याच्या घटनेनंतर मध्य रेल्वेने रेल्वे

Hasan Mushrif : राज्यात नर्सिंग शिक्षणाच्या विस्ताराला मान्यता - मंत्री हसन मुश्रीफ

- कमी शुल्कामध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध होणार मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्थेसाठी कुशल परिचारिकांची

Devendra Fadnavis : सावंतवाडीत आता 'राजधानी'सह ३ महत्त्वाच्या गाड्या थांबणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

- रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून मंजुरीचे पत्र मुंबई : कोकण रेल्वेवरील प्रवाशांसाठी आणि विशेषतः

Pratap Sarnaik : एसटी महामंडळाचा कायापालट होणार; जुन्या बसेस बदलून ताफ्यात ई-बसेस येणार

- दुर्गम भागासाठी २००० मिडी बसेस सज्ज; मंत्री प्रताप सरनाईक यांची विधानपरिषदेत घोषणा मुंबई : भविष्यात एसटी

Devendra Fadnavis : मुंबईच्या पूर नियंत्रणासाठी १३ हजार कोटींचा आराखडा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

- 'फडणवीसांना बदनाम करा, पण महाराष्ट्राला नको', विरोधकांना आवाहन मुंबई : "मुंबईला दरवर्षी भेडसावणाऱ्या

Mumbai Tree Collapse : वादळ आणि पावसात उन्मळून पडणाऱ्या झाडांचे जोखीम मूल्यांकन सुरू

मुंबई : मुंबईतील वाढत्या वादळी वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धन आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई