मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यानंतर अखिलेश यादवना भेटले रजनीकांत, चर्चेला उधाण

नवी दिल्ली: मेगास्टार रजनीकांत (Rajnikanth) यांनी रविवारी लखनऊमध्ये समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव (akhilesh yadav) यांची भेट घेतली. याआधी शनिवारी संध्याकाळी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटले होते. अभिनेता रजनीकांत अखिलेश यांच्या घरी जाऊन भेटले. अखिलेशने त्यांच्यासोबत फोटो शेअर केला आहे.


नुकताच रजनीकांत यांचा जेलर हा सिनेमा रिलीज झाला आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धुमाकूळ घालत आहे. कमाईच्या बाबतीत त्याने पीएस २ आणि इतर सिनेमांचे रेकॉर्डही तोडले आहेत.


जेलरच्या यशाने रजनीकांत खूप खूश आहे मात्र त्यांचे चाहते नाराज दिसत आहेत. याचे कारण आहे व्हिडिओ ज्यात रजनीकांत सीएम योगी आदित्यनाथ यांना भेटले आणि जेलर सिनेमा पाहण्यास सांगितला. तसेच या दरम्यान ते योगी आदित्यनाथ यांच्या पायाही पडले. काही युजर्सनी म्हटले की योगी आदित्यनाथ वयाने रजनीकांतपेक्षा लहान आहेत. यासाठी रजनीकांतचे चाहते नाराज आहेत.


अखिलेश यांना भेटून रजनीकांत म्हणाले,, मी नऊ वर्षांपूर्वी मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान अखिलेश यादव यांना भेटलो होो तेव्हा पासून आम्ही दोघे मित्र आहोत. आम्ही फोनवर बोलत असतो. पाच वर्षांपूर्वी मी येथे शूटिंगसाठी आलो होतो मात्र तेव्हा भेट होऊ शकली नाही. आता ते इथे आहेत तर मी त्यांना भेटलो.


 






जेलरचा धुमाकूळ


रजनीकांत यांनी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर आपला जलवा दाखवला आहे. जेलर सिनेमा १० ऑगस्टला रिलीज झाला होता. गदरच्या एक दिवस आधी हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाने धमाकेदार सुरूवात केली आणि जगभरात या सिनेमाने ९० कोटींहून अधिक कमाई केली.

Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी