Chandrayaan-3: चंद्रापासून केवळ २५ किमी दूर आहे 'चांद्रयान ३', आता लँडिंगची प्रतीक्षा

नवी दिल्ली: Chandrayaan-3 चे विक्रम लँडर आज २० ऑगस्टला सकाळी २ ते ३ वाजल्यादरम्यान चंद्राच्या आणखी जवळ पोहोचले आहे. आता हे लँडर २५ किमी x १३५ किमी च्या कक्षेत आहे. आधी ते ११३ किमी x १५७ किमीच्या कक्षेत होते. म्हणजेच आता चंद्राच्या पृष्ठभागापासून विक्रम लँडर केवळ २५ किमी दूर आहे. आता केवळ २३ तारखेला यशस्वी लँडिंगची प्रतीक्षा आहे.


दुसरीकडे रशियाचे बहुचर्चित लुना २५ या यानामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आहे. रशियाची अंतराळ संस्था यानाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान रशियाच्या या यानात जर काही बिघाड झाला तर चांद्रयान ३च्या आधी ते चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करू शकणार नाही. त्यामुळे चांद्रयान ३ ला ही संधी मिळू शकते.


 


चांद्रयान ३ च्या विक्रम लँडरने १७ ऑगस्ट २०२३ला प्रोपल्शन मॉड्यूल सोडले होते. ते पुढे निघून गेले होते. त्याने दुसरा मार्ग धरला होता. या रस्त्याने ते चंद्राच्या अधिक जवळ पोहोचले आहे. १८ ऑगस्टच्या दुपारी विक्रम लँडर आणि प्रोपल्शन मॉड्यूल १५३ किमी x १६३ किमीच्या कक्षेत होते. मात्र ४ वाजण्याच्या सुमारास दोघांचे रस्ते बदलले.


यानंतर विक्रम लँडर ११३ किमी x १५७ किमीच्या कक्षेत आले. हे अंतर चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ ११३ किमी होते. म्हणजेच विक्रम ११३ किमी असलेल्या पेरील्यून आणि १५७ किमीच्या एपोल्यूनमध्ये होता. पेरील्यून म्हणजेच चंद्राच्या पृष्ठभागापासून कमी दूर. अॅपोल्यून म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागापासून अधिक दूर.


सध्याच्या घडीला विक्रम लँडर उलट्या दिशेने फिरत आहे म्हणजेच रेट्रोफायरिंग करत आहे. विक्रम लँडर आता आपली उंची कमी करण्यासोबतच गतीही कमी करत आहे. आधीपासून हीच तयारी करण्यात आली होती की २० ऑगस्टच्या रात्री होणाऱ्या डिबूस्टिंगनंतर विक्रम लँडर चंद्रापासून केवळ २४ ते ३० किमी अंतरावर पोहोचेल.

Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी