Samanaa Newspaper Holi : भाजपने केली 'सामना'ची होळी!

  107

देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल खालच्या पातळीची भाषा वापरल्याचा आरोप... पाहा या होळीचा व्हिडीओ!


भांडुप : ‘सामना’ या ठाकरे गटाच्या मुखपत्रातून (Samanaa Newspaper) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) ज्या टीका करतात त्यावर अनेकदा आक्षेप घेतला गेला आहे. यावेळेस मात्र त्यांनी कहर करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे. याविरोधात भाजपचे मंडल अध्यक्ष प्रवीण दहितुले यांनी भांडुप पश्चिम (Bhandup west) येथे ‘सामना’ या ठाकरे गटाच्या मुखपत्राची होळी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल या दैनिकात खालच्या पातळीची भाषा वापरल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


मुंबईत मेट्रोपासून एस.आर.ए. पर्यंतची अनेक विकासकामे फडणवीस यांनी मार्गी लावली. सामनामध्ये त्यांच्याबद्दल अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेचा वापर करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व संजय राऊत यांनी हा इशारा समजावा. असा अवमान भाजप कार्यकर्ते सहन करणार नाहीत, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी ठाकरे व राऊत यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.



जयप्रकाश सिंग, दीपक दळवी, प्रवीण दहितुले, एडवोकेट पी एस पांडे, संजय शर्मा, राहुल जाधव, जितेंद्र परब, निकिता घाडीगावकर, विजय घोसाळकर, महेश चेंदवणकर इत्यादी कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित होते.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड

महा मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक विक्रम; ३९ महिन्यांत ओलांडला २० कोटी प्रवाशांचा टप्पा!

मुंबई : मुंबईच्या मेट्रोने आज खराखुरा इतिहास रचला आहे. अवघ्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत