Samanaa Newspaper Holi : भाजपने केली 'सामना'ची होळी!

  104

देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल खालच्या पातळीची भाषा वापरल्याचा आरोप... पाहा या होळीचा व्हिडीओ!


भांडुप : ‘सामना’ या ठाकरे गटाच्या मुखपत्रातून (Samanaa Newspaper) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) ज्या टीका करतात त्यावर अनेकदा आक्षेप घेतला गेला आहे. यावेळेस मात्र त्यांनी कहर करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे. याविरोधात भाजपचे मंडल अध्यक्ष प्रवीण दहितुले यांनी भांडुप पश्चिम (Bhandup west) येथे ‘सामना’ या ठाकरे गटाच्या मुखपत्राची होळी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल या दैनिकात खालच्या पातळीची भाषा वापरल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


मुंबईत मेट्रोपासून एस.आर.ए. पर्यंतची अनेक विकासकामे फडणवीस यांनी मार्गी लावली. सामनामध्ये त्यांच्याबद्दल अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेचा वापर करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व संजय राऊत यांनी हा इशारा समजावा. असा अवमान भाजप कार्यकर्ते सहन करणार नाहीत, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी ठाकरे व राऊत यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.



जयप्रकाश सिंग, दीपक दळवी, प्रवीण दहितुले, एडवोकेट पी एस पांडे, संजय शर्मा, राहुल जाधव, जितेंद्र परब, निकिता घाडीगावकर, विजय घोसाळकर, महेश चेंदवणकर इत्यादी कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित होते.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.