भांडुप : ‘सामना’ या ठाकरे गटाच्या मुखपत्रातून (Samanaa Newspaper) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) ज्या टीका करतात त्यावर अनेकदा आक्षेप घेतला गेला आहे. यावेळेस मात्र त्यांनी कहर करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे. याविरोधात भाजपचे मंडल अध्यक्ष प्रवीण दहितुले यांनी भांडुप पश्चिम (Bhandup west) येथे ‘सामना’ या ठाकरे गटाच्या मुखपत्राची होळी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल या दैनिकात खालच्या पातळीची भाषा वापरल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मुंबईत मेट्रोपासून एस.आर.ए. पर्यंतची अनेक विकासकामे फडणवीस यांनी मार्गी लावली. सामनामध्ये त्यांच्याबद्दल अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेचा वापर करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व संजय राऊत यांनी हा इशारा समजावा. असा अवमान भाजप कार्यकर्ते सहन करणार नाहीत, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी ठाकरे व राऊत यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
जयप्रकाश सिंग, दीपक दळवी, प्रवीण दहितुले, एडवोकेट पी एस पांडे, संजय शर्मा, राहुल जाधव, जितेंद्र परब, निकिता घाडीगावकर, विजय घोसाळकर, महेश चेंदवणकर इत्यादी कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित होते.
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…
मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…
मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…
मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…
मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…