Black marketing of Rice : तांदळाचा काळाबाजार! वर्धा जिल्ह्यातील ८८ हजार किलो तांदूळ जप्त

साठेबाजांचे चांगलेच धाबे दणाणले


वर्धा : वर्धा (Wardha) जिल्ह्यातील पुलगाव येथे तांदळाच्या गोदामावर छापा टाकत पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ८८ हजार किलो तांदूळ जप्त करण्यात आला आहे. या गोदामामध्ये अनेक दिवसांपासून तांदळाचा काळाबाजार (Black marketing of Rice) सुरु असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार छापा टाकत हा तांदूळ जप्त करण्यात आला आहे.


विशेष बाब म्हणजे वर्ध्यातील शासकीय तांदूळ छत्तीसगडला रवाना होत होता. स्वस्त धान्य दुकानातून तांदूळ खरेदी करुन तो छत्तीसगडच्या राईस मिलमध्ये पाठवला जायचा, ही बाब तपासातून समोर आली आहे. या प्रकरणी तांदळाची वाहतूक करणार्‍या तीन ट्रकचालकांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्यावर जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.


वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील महेश शामलाल अग्रवाल या व्यापार्‍याचं हे गोदाम होतं. वर्धा पोलिसांच्या कारवाईनंतर शासकीय तांदळाचा काळाबाजार करणार्‍या साठेबाजांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Babasaheb Patil : ६१ हजार ९०० शेतकऱ्यांना उद्या कर्जमाफीचा लाभ मिळणार

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील; पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खातेधारकांची यादी जाहीर होणार मुंबई (Mumbai):

Moshi Garbage Depot Accident : मोशी कचरा डेपो दुर्घटना : मृतांच्या वारसांना १० लाखांची आर्थिक मदत

पुणे : मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी झालेल्या दुर्घटनेत (Moshi Garbage Depot Accident) मृत्यू झालेल्या नऊ नागरिकांच्या

बिबट्याच्या दहशतीचा अखेर अंत! ११ बकऱ्या, एका वासराचा फडशा पाडणारा बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद

- सलग दोन हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाच्या तत्पर कारवाईमुळे गावकऱ्यांनी सोडला

PMFBY : महाराष्ट्रात सन २०२६-२७ साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू; ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

महाराष्ट्रात सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून,

Maharashtra Monsoon Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम! राज्यात आतापर्यंत सरासरीच्या ९५ टक्क्यांहून अधिक पाऊस

- पालघरमध्ये एका दिवसात तब्बल १८३ मिमी पावसाची नोंद मुंबई : राज्यात मान्सून (Maharashtra Monsoon Update) पुन्हा सक्रिय झाला असून

Heart-wrenching incident in Nagpur : शाळेत मधल्या सुट्टीत धावताना अचानक कोसळल्याने ८ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

नागपूर: नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी शाळेत अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावणारी घटना