Narli Pournima : सण आयलाय गो आयलाय गो... नारळी पुनवेचा!

कोळी बांधवांकडून होडीच्या सजावटीची जय्यत सुरुवात... पाहा याचा खास व्हिडीओ


जाणून घ्या काय आहे नारळी पौर्णिमेमागील शास्त्रीय कारण?


मुंबई : चातुर्मासाची सुरुवात करणारा श्रावण (Shrawan) महिना तसा सणासुदीने भरलेलाच. याच श्रावणातील नागपंचमी, गोकुळाष्टमी, दहिहंडी, श्रावणी सोमवार या सणांबरोबरच उत्साहाने साजरा केला जाणारा सण म्हणजेच नारळी पौर्णिमा (Narli Pournima). समुद्रकिनारी राहणारे व समुद्राशी खूप जवळचा संबंध असणारे कोळी लोक हा सण खूप उत्साहाने साजरा करतात.


यंदाच्या वर्षीही या नारळीपौर्णिमेच्या सणाची जोरदार तयारी कोळी बांधवांनी सुरु केली आहे. त्यांनी आपापल्या होड्यांना रंगरंगोटी करुन सजवण्यास सुरुवात केली आहे. अगदी पूर्वीपासून ते आजतागायत चालत आलेली ही परंपरा ते अगदी आनंदाने जपत आहेत. पण याचे एक शास्त्रीय कारणदेखील आहे. श्रावण महिना म्हणजे पावसाचा काळ. या काळात समुद्र खवळलेला असतो. तसेच हा माशांचा प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे नारळीपौर्णिमेच्या काही दिवस अगोदरच कोळी बांधव समुद्रात जाणे, मासेमारी करणे बंद करतात. म्हणजेच निसर्गाचे रक्षण केले जाते.


या सणाला धार्मिक बाजूदेखील आहे. समुद्र हे वरूण देवाचे स्थान समजले जाते. वरुण देव हा पश्चिम दिशेचा रक्षक असून त्याला या नारळीपौर्णिमेच्या दिवशी नारळ अर्पण करुन त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. मासेमारीचा बंद केलेला व्यवसाय नारळीपौर्णिमेच्या दिवशी पुन्हा सुरु केला जातो. पावसाळा संपलेला असतो त्यामुळे सागराची पूजा करुन व्यवसायाचा शुभारंभ केला जातो. नारळीपौर्णिमेच्या दिवशी मासेमारीचा शुभारंभ करताना होडीला रंगरंगोटी करुन सजवले जाते, पताका लावून सुशोभित केले जाते. आपल्या उदरनिर्वाहासाठी कामी येणार्‍या प्रत्येक गोष्टीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची कोळ्यांची भावना यातून दिसून येते.


अत्यंत पारंपरिक पद्धतीने साजर्‍या केल्या जाणार्‍या या सणाची लगबग मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमधील कोळीवाड्यात जास्त प्रमाणात पाहायला मिळते. अशाच उत्साहात यंदाच्या नारळीपौर्णिमेसाठी कोळी बांधवांची लगबग सुरु झाली आहे. माहिम रेती बंदर, कोळीवाडा येथील काही कोळी बांधवांची होड्या सजवतानाची खास दृश्ये टिपली आहेत आमचे छायाचित्रकार अरुण पाटील यांनी...



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती