मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित, सरकारवर टीका

मुंबई: मुंबई विद्यापीठाकडून (mumbai university) जाहीर करण्यात आलेल्या नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीला (senate election) शिंदे-फडणवीस सरकारने अचानक स्थगिती दिली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने परिपत्रक काढून सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम रद्द केला. निवडणुकीचा कार्यक्रम रद्द केल्यामुळे ठाकरे गट तसेच मनसे गटाकडून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. तसेच अचानक निवडणुकीचा कार्यक्रम रद्द केल्याने चर्चेला उधाण आले आहे.


येत्या १० सप्टेंबरला विद्यापीठाने जाहीर केलेल्या नोंदणी पदवीधर मतदरासंघाची सिनेट निवडणूक होणार होती. यासाठी मनसेकडून तसेच ठाकरे गटानेही जोरदार तयारी केली होती. मात्र सरकारने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे सर्वत्र नाराजीचे सूर उमटत आहेत.


निवडणूक कार्यक्रम रद्द केल्याबद्दल नाराजी व्यक्त करत मनसेचे नेते संदीप देशपाडेंनी सांगितले की, सिनेट निवडणुका रद्द करणे म्हणजे कुठल्याच निवडणुका घ्यायच्या नाहीत या हुकूमशाही प्रवृत्तीच्या दृष्टीने टाकलेलं पाहिलं पाऊल आहे.तर दुसरीकडे ठाकरे गटाचे वरूण सरदेसाई यांनीही ट्विटरवरून ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली.





मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित करून टाकली! निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर असे करणे हे बेकायदेशीर आणि घाबरटपणाचे लक्षण आहे.आपण जिंकणार नाही म्हणून कोणत्याच निवडणूका नकोत, अगदी विद्यापीठाच्या पण नकोत हे लोकशाहीला प्रचंड घातक आहे. निषेध असे ते ट्विटरवर म्हणाले.

Comments
Add Comment

Bandra News : वांद्रे परिसरातील जागेवरील कारवाईदरम्यान राडा; जमावाला रोखण्यासाठी पोलिसांची धडक कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरातील गरीबनगर भागात अवैध बांधकामांवर सुरू असलेल्या कारवाईदरम्यान सलग

Bandra News : वांद्रे स्टेशन परिसरात अतिक्रमण हटवणाऱ्यांवर दगडफेक, ६ पोलीस आणि ४ आंदोलक जखमी

मुंबई : वांद्रे पूर्वेकडील बेहरामपाडा परिसरात रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान

Cyprus and India : सायप्रस आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंध दृढ

सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस 'इश्का' बॉलिवूड चित्रपटाचा थाटात मुहूर्त मुंबई :

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार