मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित, सरकारवर टीका

मुंबई: मुंबई विद्यापीठाकडून (mumbai university) जाहीर करण्यात आलेल्या नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीला (senate election) शिंदे-फडणवीस सरकारने अचानक स्थगिती दिली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने परिपत्रक काढून सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम रद्द केला. निवडणुकीचा कार्यक्रम रद्द केल्यामुळे ठाकरे गट तसेच मनसे गटाकडून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. तसेच अचानक निवडणुकीचा कार्यक्रम रद्द केल्याने चर्चेला उधाण आले आहे.


येत्या १० सप्टेंबरला विद्यापीठाने जाहीर केलेल्या नोंदणी पदवीधर मतदरासंघाची सिनेट निवडणूक होणार होती. यासाठी मनसेकडून तसेच ठाकरे गटानेही जोरदार तयारी केली होती. मात्र सरकारने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे सर्वत्र नाराजीचे सूर उमटत आहेत.


निवडणूक कार्यक्रम रद्द केल्याबद्दल नाराजी व्यक्त करत मनसेचे नेते संदीप देशपाडेंनी सांगितले की, सिनेट निवडणुका रद्द करणे म्हणजे कुठल्याच निवडणुका घ्यायच्या नाहीत या हुकूमशाही प्रवृत्तीच्या दृष्टीने टाकलेलं पाहिलं पाऊल आहे.तर दुसरीकडे ठाकरे गटाचे वरूण सरदेसाई यांनीही ट्विटरवरून ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली.





मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित करून टाकली! निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर असे करणे हे बेकायदेशीर आणि घाबरटपणाचे लक्षण आहे.आपण जिंकणार नाही म्हणून कोणत्याच निवडणूका नकोत, अगदी विद्यापीठाच्या पण नकोत हे लोकशाहीला प्रचंड घातक आहे. निषेध असे ते ट्विटरवर म्हणाले.

Comments
Add Comment

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक