Wamanrao Pai : वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे

Share
  • जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै

आकार व संस्कार हे दोन्ही व्यक्तिमत्त्व निर्माण करतात. संस्कार! संस्कार जे केले जातात ते महत्त्वाचे असतात. जन्माला आलेल्या मुलाकडे काय असते? तो हिंदू किंवा मुसलमान काही नसतो, त्याला हे काही माहीत नसते. त्याला पहिला संस्कार म्हणजे नाव देतो. बाराव्या दिवशी त्याला आपण नाव देतो. पुढे बापाचे नाव, पुढे आडनाव यावर सगळे जात-धर्म येऊन चिकटतात. नावाबरोबर हे सगळे येऊन चिकटते. हे लटांबर नावाला येऊन चिटकते व ते नाव या सर्वांसकट आपल्याला चिकटलेले असते आणि त्याचे एक व्यक्तिमत्त्व तयार होते. मग तो म्हणतो, मी हिंदू, मी मुसलमान, मी ख्रिश्चन. हे सगळं कधी? तो जन्माला आला, तेव्हा हे काही नव्हते. नाव दिल्याबरोबर हे सगळं येऊन चिकटले.

पुढे आणखी संस्कार दिले जातात. श्रेष्ठ कनिष्ठ, आमचा धर्म श्रेष्ठ, आमचा देव श्रेष्ठ. तुम्ही आमच्या धर्मात या नाहीतर आम्ही काही, तरी करू. ही वृत्ती निर्माण झाली यालाच धर्माभिमान म्हणतात. या धर्मामध्ये पुन्हा जाती आहेतच. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, पुन्हा त्यात उपजाती, त्यात पुन्हा पोटजाती हा सगळा गोतावळा आला व आपण याला संस्कार म्हणतो. यातून संस्कार जे करतो त्यातून मी श्रेष्ठ-कनिष्ठ ही भावना निर्माण झाली. Superiority complex, inferiority complex या दोन्ही गोष्टी निर्माण झाल्या, हे सगळे घटक आहे. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन असल्याने काही बिघडत नाही. आमचे घराणे श्रेष्ठ, आमची जात श्रेष्ठ, तुम्ही कनिष्ठ इथे सगळं बिघडले. तुकाराम महाराज सांगतात,

“विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म,
भेदाभेद भ्रम अमंगळ
आइकाजी तुम्ही भक्तभागवत,
कराल ते हित सत्य करा
कुणाही भुताचा न घडो मत्सर,
वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे
तुका म्हणे एका देहाचे अवयव,
सुखदुःख जीव भोग पावे.”

हित शब्द महत्त्वाचा आहे. हे हित लोक बघत नाहीत. सगळा घात झाला याचे कारण तुकाराम महाराज सांगतात ते हित लोक बघत नाहीत. “न घडो कुणाही भुताचा मत्सर वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे.” वर्म हा शब्द वापरलेला आहे. धर्माचे वर्म हे आहे, कर्माचे वर्म हे आहे, जातीचे वर्म हे आहे. हे वर्म विसरलात की, भेद करायला सुरुवात होते. एकदा हे वर्म आठवले की, विष्णुमय जग म्हणजे हे जग दिव्य आहे, हे जग देव आहे, हे जग विष्णुमय आहे, हे जग ईश्वर आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

10 minutes ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

43 minutes ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

1 hour ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

10 hours ago